शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करावेत

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत.

पुणे : निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत. आरोप करणारांनी ते सिद्ध करावेत. येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदानाची अंतिम आकडेवारी टाकली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.मतदान यंत्रावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना कुणाल कुमार यांनी सर्व आरोप खोडून काढले व प्रशासनाचे कामकाज पारदर्शीच असल्याचा दावा केला. मतमोजणीनंतर लगेचच जाहीर करण्यात आलेली आकडेवारी अंतिम नव्हती. महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकलेली आकडेवारीही फक्त माहितीकरता म्हणून जाहीर करण्यात आली होती. आयोगाच्या संकेतस्थळावर येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल, असे कुणाल कुमार म्हणाले.आरोपाविषयी बोलताना त्यांनी पराभूतांकडूनच तक्रारी केल्या जात आहेत, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मतदानाच्या आधी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मॉक पोल म्हणजे मतदानाची रंगीत तालीम घेतली जाते. त्यावेळी, नंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडताना, मतदान यंत्रे सील केली जाताना, ती स्ट्रॉँग रूममध्ये एक दिवस बंदिस्त असताना कोणीही तक्रार केली नाही. मतमोजणी सुरू असतानाही कोणाची तक्रार नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र आता तक्रार व आरोप केले जात आहेत, शंका व्यक्त होत आहेत. त्यात काही तथ्य नाही.मतदानातील तफावतीबाबत कुणाल कुमार म्हणाले, काही निर्णय अधिकाऱ्यांनी टपाली मतदान एकूण मतदानात जमेस धरले तर काहींनी नाही. त्यामुळे बेरजेत फरक दिसतो आहे. अंतिम आकडेवारीत तो दुरूस्त होईल. त्यामळे एकाही प्रभागाच्या निकालात काही फरक पडणार नाही, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. मतमोजणीनंतर दोन दिवस सुटी होती. अधिकारी, कर्मचारी सलग दोन दिवसांच्या कामाने थकले होते, त्यामुळे आता सर्व बेरजा करून अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल.>तक्रारी नाहीतप्रभाग क्रमांक १ कळस धानोरी येथील तक्रारीशिवाय एकही तक्रार आलेली नाही. तेथील तक्रारीची तपासणी सुरू आहे. मतदान यंत्रातील सर्व मते तसेच पोस्ट मतेही सुरक्षित आहेत. एक वर्षापर्यंत हा दस्तऐवज जपून ठेवण्यात येतो. निकाल लागल्यापासून १० दिवसांच्या आत न्यायालयीन तक्रार करावी लागते. तशी तक्रार झाली तरी प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शीपणा असल्यामुळे सर्व माहिती लगेच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.