शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या मते भ्रष्टाचार झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 06:19 IST

प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील दावा : मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल

मुंबई : राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असतानाच प्रजा फाउंडेशनने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल गुरुवारी सादर केला. मतदारसंघनिहाय सर्वेक्षणानुसार आमदारांचा भ्रष्टाचार पाच वर्षांत ३८ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत घरसल्याची मतदारांची भावना आहे. तर, विधिमंडळातील साधारण उपस्थिती वाढली असली तरी प्रश्न उपस्थित करण्याचे प्रमाण मात्र ४२ टक्क्यांनी घसरल्याचे ‘प्रजा’च्या अहवालात नमूद केले आहे.

प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत प्रजा फाउंडेशनने मुंबईतील ३६ आमदारांच्या कामगिरीचा वार्षिक आणि पंचवार्षिक अहवाल सादर केला. आमदारांची विधिमंडळातील कामगिरी, दाखल गुन्हे, मतदारसंघातील उपलब्धता अशा विविध निकषांवर आमदारांची कामगिरी जोखण्यात आली आहे. प्र्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता आणि संचालक मिलिंद म्हस्के यांनी हा अहवाल सादर केला. या वर्षीच्या कामगिरीनुसार शिवसेनेचे वरळी येथील आमदार सुनील शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुंबादेवीतील काँग्रेस आमदार अमिन पटेल दुसऱ्या तर मालाड येथील काँग्रेस आमदार अस्लम शेख तिसºया क्रमांकावर आहेत. तर, पंचवार्षिक अहवालात अमिन पटेल यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे सुनील प्रभू दुसºया तर अस्लम शेख तिसºया क्रमांकावर आहेत. पक्षीय पातळीवरील काँग्रेसच्या आमदारांनी एकत्रितपणे ७५ टक्के, भाजप आमदारांनी ६५ टक्के तर शिवसेना आमदारांनी ६० टक्के गुणांची कमाई केल्याचे प्र्रजा फाउंडेशनने स्पष्ट केले.

मागील सरकार व विद्यमान सरकारच्या काळातील आमदारांच्या कामगिरीची अहवालात तुलना केली आहे. २०१४ मध्ये ५९ टक्के तर आता ६४ टक्क्यांवर आली आहे. नागरिकांचे एकूण जीवनमान आठ टक्क्यांनी सुधारले आहे. २०१४ या निवडणूक वर्षातील आमदारांची मतदारसंघातील लोकांसाठीची उपलब्धता ३३ टक्के होती. या वर्षी मात्र ही टक्केवारी थेट ६० वर गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदारांची विधिमंडळातील कामगिरी मात्र ढासळली आहे. २००९ ते २०१४ या १२ व्या विधानसभेच्या कार्यकाळात मुंबईतील आमदारांनी ३८,६१८ प्रश्न उपस्थित केले होते. याउलट २०१४ ते २०१९ या १३ व्या विधानसभेत फक्त २२,३४५ प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या कामकाजातील ही घट ४२ टक्के इतकी आहे.

आमदार निधी खर्च करण्याच्या बाबतीत मुंबईतील सर्वच आमदार आघाडीवर आहेत. चांदिवलीचे काँग्रेस आमदार नसिम खान यांनी सर्वाधिक ९ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च केला आहे. तर, माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी सर्वांत कमी म्हणजे ५ कोटी ८६ लाखांचा निधी विकासकामांवर खर्च केला.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार