शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कलावंतांची ‘एक्ङिाट’ घडविणारे अपघात !

By admin | Updated: June 8, 2014 01:54 IST

मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत.

राज चिंचणकर 
नाटकांचे दौरे, चित्रपटांची शूटिंग्ज यासाठी करावा लागणारा वेळीअवेळी प्रवास, दगदग, धावपळ, दिलेल्या वेळा पाळण्यासाठी करावी लागणारी कसरत या सगळय़ाचा एकत्रित परिणाम कलावंतांच्या दिनक्रमावर होत असतो. याचा थेट संबंध कलावंतांच्या आरोग्याशी येतो आणि काही वेळा हा हलगर्जीपणा जिवावरही बेततो. मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत. 
कलावंतांच्या अपघातांचा सिलसिला सामोर आला तो 198क् मध्ये! ज्येष्ठ कलावंत जयराम हर्डीकर व शांता जोग यांना त्या वर्षी अपघातातून काळाने हिरावून नेले आणि कलावंतांच्या अपघाती मृत्यूची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षातच अरुण सरनाईक अपघाताचे कारण होऊन काळाच्या पडद्याआड गेले. लाडका कलावंत अपघाताचे निमित्त होऊन अंतर्धान पावतो. यावर भल्याभल्यांना विश्वास ठेवणो कठीण गेले. 21 जून 1994 रोजी ते ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून टॅक्सीने पुण्याहून कोल्हापूरला चालले होते. पुणो - कोल्हापूर मार्गावरच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अरुण सरनाईक नावाचा रसिकप्रिय अभिनेता काळाने हिरावून नेला. 
मराठी चित्रपटसृष्टीतला एक काळ गाजवणारी रंजना देशमुख या अभिनेत्रीला  अपघातात अपंगत्व आले. 1987 मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने तिची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली. 
दूरदर्शनवरून बातम्या सांगणारा गोड चेहरा व मधाळ आवाज यांचा संगम असलेली तसेच नाटय़सृष्टीत अभिनयाचे खणखणीत नाणो वाजवत ‘ती फुलराणी’ म्हणून अजरामर झालेल्या भक्ती बर्वे यांना पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला आणि प्रत्येकाच्या मनाचा बांध फुटला. 11 फेब्रुवारी 2क्क्1 रोजी पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावरील दिव्याच्या खांबावर त्यांची गाडी आदळली आणि भक्ती बर्वे नावाचे पर्व अचानक काळाच्या उदरात गडप झाले. 
अगदी अलीकडेच म्हणावा असा अपघात दोन वर्षापूर्वी मुंबई-पुणो द्रुतगती मार्गावर  झाला होता. 24 डिसेंबर 2क्12 रोजी आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या जोडगोळीने अचानक घेतलेला निरोप चटका लावणारा ठरला. हे दोघे ‘वॅगन आर’मधून या मार्गावरून प्रवास करीत 
असताना चालकाचा ताबा सुटलेला एक टेम्पो त्यांचा काळ बनून त्यांना सामोर आला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. उर्स टोल चेकपोस्टजवळ घडलेल्या या अपघाताने मराठी सिनेसृष्टी व मालिकेच्या विश्वातले दोन आघाडीचे मोहरे हरपले. वाढलेली आणि वाढवून घेतलेली कामे, शूटिंग्जची शेडय़ुल्स या सगळय़ांमुळे आजही बरेचसे कलावंत ‘चलता हैं’ या भूमिकेतून वेळीअवेळी प्रवास करीतच आहेत. अर्थात, अपघाताला निमंत्रण नको म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. असा काही नियम नाही आणि याबाबतीत तशी ती होऊही नये, असेच तमाम मायबाप रसिकांचे या कलावंतांना सांगणो आहे.