शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

दर पाच मिनिटांनी होतो एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 00:01 IST

मृत्यूचा घनता दर: अपघात रोखण्यासाठी शासन करणार प्रयत्न

बुलडाणा : रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या मोठी असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मृत्यू घनता दराची आकडेवारी निश्‍चित केली आहे. त्यानुसार दर पाच मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरुकता नाही. रस्त्यांवर सूचना फलकांचा अभाव, बेशिस्त वाहतूक, पादचार्‍यांचे रस्त्यांकडे होणारे दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरते. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात चवथा क्रमांक लागतो. सर्वात जास्त अपघात होणार्‍या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक या सहा शहरांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूच्या घनता दराची आकडेवारी तयार करून त्या आधारे महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.** गोल्डन अवरमध्ये सुविधाजीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल रूम आणि टोल फ्री १0८ सेवा पुरविल्या जाईल. सर्वच खासगी तसेच सरकारी रुग्णालय, रुग्णवाहिका, शववाहिका, रक्तपेढी, पोलिस स्टेशन या सर्वांनाच अपघाताची माहिती तातडीने उपलब्ध होईल. ह्यगोल्डन अवरह्ण अर्थात तातडीच्या प्रसंगी मिळालेल्या या सुविधांनी जखमींना उपचार मिळू शकतील. ** सवरेत्तम आरोग्य सेवा मिळणारअपघात रोखण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात; शिवाय जिल्हा प्रशासन, परिवहन विभाग, पोलिस, बांधकाम विभाग, रस्ते प्राधिकरण, आरोग्य विभाग या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, यासाठी मृत्यूचा घनता दर निश्‍चित करण्यात आला आहे. ** मृत्यूदर वाढण्याची भीतीलोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे. म्हणजे १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात. मृत्यूच्या घनता दरानुसार पाच मिनिटाला यापैकी एकाचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो. सध्याच्या मृत्यूच्या घनता दरानुसार हे प्रमाण बघता, २0२0 पर्यंत तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तविली आहे.