शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दर पाच मिनिटांनी होतो एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 00:01 IST

मृत्यूचा घनता दर: अपघात रोखण्यासाठी शासन करणार प्रयत्न

बुलडाणा : रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या मोठी असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मृत्यू घनता दराची आकडेवारी निश्‍चित केली आहे. त्यानुसार दर पाच मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरुकता नाही. रस्त्यांवर सूचना फलकांचा अभाव, बेशिस्त वाहतूक, पादचार्‍यांचे रस्त्यांकडे होणारे दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरते. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात चवथा क्रमांक लागतो. सर्वात जास्त अपघात होणार्‍या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक या सहा शहरांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूच्या घनता दराची आकडेवारी तयार करून त्या आधारे महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.** गोल्डन अवरमध्ये सुविधाजीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल रूम आणि टोल फ्री १0८ सेवा पुरविल्या जाईल. सर्वच खासगी तसेच सरकारी रुग्णालय, रुग्णवाहिका, शववाहिका, रक्तपेढी, पोलिस स्टेशन या सर्वांनाच अपघाताची माहिती तातडीने उपलब्ध होईल. ह्यगोल्डन अवरह्ण अर्थात तातडीच्या प्रसंगी मिळालेल्या या सुविधांनी जखमींना उपचार मिळू शकतील. ** सवरेत्तम आरोग्य सेवा मिळणारअपघात रोखण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात; शिवाय जिल्हा प्रशासन, परिवहन विभाग, पोलिस, बांधकाम विभाग, रस्ते प्राधिकरण, आरोग्य विभाग या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, यासाठी मृत्यूचा घनता दर निश्‍चित करण्यात आला आहे. ** मृत्यूदर वाढण्याची भीतीलोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे. म्हणजे १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात. मृत्यूच्या घनता दरानुसार पाच मिनिटाला यापैकी एकाचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो. सध्याच्या मृत्यूच्या घनता दरानुसार हे प्रमाण बघता, २0२0 पर्यंत तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तविली आहे.