शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एकाच दिवशी काळाची झडप; मायलेकाच्या मृत्यूनं गावकरी सुन्न, ३ बहिणी पोरक्या झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:36 IST

मायलेकांच्या मृतदेहांना शेजारी शेजारीच अग्निडाग देण्यात आला असता अंत्यसंस्कारासाठी आलेले सारेच गहिवरले.

पंचवटी : सिन्नर-शिर्डी मार्गावर इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.११) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने पंचवटीतील दत्तनगर येथे राहाणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मायलेकांवर अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावीजवळील माळवाडी फाट्यानजीक शर्वरी लॉन्ससमोर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पंचवटीतील सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) व त्यांचा मुलगा वैभव अशोक कुलकर्णी (३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुलकर्णी हे मूळचे वावी येथील रहिवासी असून ते पंचवटीत वास्तव्यास होते. वैभव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता तर दहा वर्षापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. तो एचडीएफसी बँकेच्या वसूली विभागात कामास होता. मायलेकांच्या या मृत्यूने तीन बहिणी पोरक्या झाल्या आहेत. 

कुलकर्णी कुटुंबीयांची वावीजवळील माळवाडी(फुलेनगर) येथे शेतजमीन आहे. कुलकर्णी कुटुंबीयातील मायलेक अधून मधून शेतीवर जात असत. रविवारी सकाळी कुलकर्णी मायलेक दुचाकीवरून माळवाडी फुलेनगरला जाताना वावीजवळील फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूंची वार्ता कळताच सर्वांनाच धक्का बसला. 

अपघातांची मालिकातीन दिवसांपूर्वी सिन्नर मार्गावर झालेल्या अपघातात सिडकोतील पाच विद्यार्थ्यावर काळाने झडप घातली होती. याच मार्गावर लागोपाठ झालेल्या दुसऱ्या घटनेने मायलेकांना जीव गमवावा लागला. गेल्या आठ तारखेला बस जळून अपघात घडला होता.

आई आणि भाऊ गेल्याने बहिणी झाल्या पोरक्यावैभव यांना तीन बहिणी असून त्यातील दोघींचा विवाह झालेला आहे. त्यामुळे अविवाहित असलेली बहीण पोरकी झाली आहे. एकाच दिवशी आई आणि भाऊ हरपल्याने तिला दुःख अनावर झाले. मयत सुवर्णा कुलकर्णी यांच्या ९१ वर्षांच्या आईची जबाबदारी देखील आता बहिणीवर आली आहे. आजींना आपली लेक आणि नातू गेल्याची कल्पना देण्यात आलेली नाही. वर्षभरापूर्वी त्यांच्या ५७ वर्षांच्या मुलाचा कोरोनात मृत्यू झाल्याचे देखील त्यांना अद्यापही माहिती नाही.

मायलेकांवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारएकाच दिवशी दोघांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारच्या सुमारास दोघांचेही मृतदेह आल्यानंतर संपूर्ण परिसर सुन्न झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. कुलकर्णी कुटुंबातील बहिणींना अश्रू अनावर झाले. नाशिक अमरधाममध्ये मृतांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकांच्या मृतदेहांना शेजारी शेजारीच अग्निडाग देण्यात आला असता अंत्यसंस्कारासाठी आलेले सारेच गहिवरले.