शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शेतकऱ्यांना मिळणार अपघात विमा

By admin | Updated: September 19, 2015 23:14 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.राज्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना या उपक्रमातून पुन्हा कर्ज दिले जाईल. ग्रामपंचायत हद्दीमधील तलाव हे पंचायतींना दिले जातील. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय झाला असून, मासेमारीसाठी तलावांचा उपयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना करपामुक्त केळी रोपे मिळावीत, यासाठी इंडो-इस्रायल केळी संशोधन केंद्र महिनाभरात जिल्ह्यात स्थापन केले जाईल. टिश्यू केळीच्या रोपांसाठी कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करीत आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के कर्ज देता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ४,५०० सहकारी संस्था बंद अवस्थेत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन होईल का? याबाबत उपनिबंधकांना आदेश दिले आहेत. त्या फक्त कागदावरच राहत असतील तर त्यांची नोंदणी रद्द करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी ४०० कोटी आणण्याचा प्रयत्न असेल, असेही खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)