शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

शेतकऱ्यांना मिळणार अपघात विमा

By admin | Updated: September 19, 2015 23:14 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.राज्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना या उपक्रमातून पुन्हा कर्ज दिले जाईल. ग्रामपंचायत हद्दीमधील तलाव हे पंचायतींना दिले जातील. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय झाला असून, मासेमारीसाठी तलावांचा उपयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना करपामुक्त केळी रोपे मिळावीत, यासाठी इंडो-इस्रायल केळी संशोधन केंद्र महिनाभरात जिल्ह्यात स्थापन केले जाईल. टिश्यू केळीच्या रोपांसाठी कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करीत आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के कर्ज देता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ४,५०० सहकारी संस्था बंद अवस्थेत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन होईल का? याबाबत उपनिबंधकांना आदेश दिले आहेत. त्या फक्त कागदावरच राहत असतील तर त्यांची नोंदणी रद्द करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी ४०० कोटी आणण्याचा प्रयत्न असेल, असेही खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)