शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

By admin | Updated: March 11, 2016 02:24 IST

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली

नंडोरे : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला २ लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.महाराष्ट्र सरकारने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात वीमा योजना सुरू केली. २००९-२०१० पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. या अंतर्गत १ लाखाचे विमा संरक्षण दिले जात होते. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने २०१५-१६ पासून या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नवीन नाव देण्यात आले. मात्र त्याचवेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले. या अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख इतकी नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही संस्थेने वीमा कंपन्याकडे स्वतंत्र्यरित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज असणार नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य असतील. किंबहुना अशाप्रकारे शेतकऱ्याने आधीच वीमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नसून या योजनेअंतर्गत मिळणरे लाभ स्वतंत्र असतील. शेतीव्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वीजेचा शॉक, इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक दिलासा देण्याकरीता शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. कृषी विभागाने या योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून बजाज कॅपीटल इन्शुअरन्स ब्रोकिंम लि. तसेच विमा कंपनी म्हणून नॅशनल इन्शुअरन्स कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली आहे. (वार्ताहर)