शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

By admin | Updated: March 11, 2016 02:24 IST

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली

नंडोरे : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला २ लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.महाराष्ट्र सरकारने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात वीमा योजना सुरू केली. २००९-२०१० पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. या अंतर्गत १ लाखाचे विमा संरक्षण दिले जात होते. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने २०१५-१६ पासून या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नवीन नाव देण्यात आले. मात्र त्याचवेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले. या अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख इतकी नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही संस्थेने वीमा कंपन्याकडे स्वतंत्र्यरित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज असणार नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य असतील. किंबहुना अशाप्रकारे शेतकऱ्याने आधीच वीमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नसून या योजनेअंतर्गत मिळणरे लाभ स्वतंत्र असतील. शेतीव्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वीजेचा शॉक, इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक दिलासा देण्याकरीता शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. कृषी विभागाने या योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून बजाज कॅपीटल इन्शुअरन्स ब्रोकिंम लि. तसेच विमा कंपनी म्हणून नॅशनल इन्शुअरन्स कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली आहे. (वार्ताहर)