शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

By admin | Updated: March 11, 2016 02:24 IST

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली

नंडोरे : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला २ लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.महाराष्ट्र सरकारने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात वीमा योजना सुरू केली. २००९-२०१० पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. या अंतर्गत १ लाखाचे विमा संरक्षण दिले जात होते. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने २०१५-१६ पासून या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नवीन नाव देण्यात आले. मात्र त्याचवेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले. या अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख इतकी नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही संस्थेने वीमा कंपन्याकडे स्वतंत्र्यरित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज असणार नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य असतील. किंबहुना अशाप्रकारे शेतकऱ्याने आधीच वीमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नसून या योजनेअंतर्गत मिळणरे लाभ स्वतंत्र असतील. शेतीव्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वीजेचा शॉक, इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक दिलासा देण्याकरीता शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. कृषी विभागाने या योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून बजाज कॅपीटल इन्शुअरन्स ब्रोकिंम लि. तसेच विमा कंपनी म्हणून नॅशनल इन्शुअरन्स कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली आहे. (वार्ताहर)