शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:44 IST

नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे.

योगेश बिडवईमुंबई : नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना चेकने पैसे देणेसुरू केल्याने, रोकड टंचाईमुळे गावातील व्यापार ठप्प झालाआहे. यामुळे लासलगावची दररोजची सुमारे दोन कोटींची उलाढालआता केवळ ५० लाखांवर आली आहे.सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटाबंदीनंतर गेल्या वर्षी रोकडअभावी कांदा मार्केट दोन महिने जवळपास बंद असल्यासारखी स्थिती होती. त्याचा व्यावसायिकांना फटका बसला. आता शेतकºयांना चेक देणे सुरू झाले आहे. ते पैसे दोन-तीन दिवसांत खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे कांदा विकल्यानंतर गावी जाण्यापूर्वी लासलगावातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शेतकºयांनी बंद केले आहे.लासलगाव येथील बाजारपेठेत किराणा, कापड, वाहनांचे स्पेअरपार्ट, खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे आदींचे डिलर्स आहेत. अपेक्षित व्यवसायाअभावी ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी एकत्र येत, त्यावर मार्ग काढण्यासाठी महासंघ स्थापन केला आहे.रोख व्यवहार हवेत‘कॅशलेस’च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्व व्यापाºयांनी शनिवारी बैठक घेतली. कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना किमान १० हजार रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी लासलगाव बाजार समितीकडे केली आहे.लाखो रुपये गुंतवणूक करून व्यापाºयांनी व्यवसाय सुरू केले. कांद्याचे व्यापारी चेकने पैसे देत असल्याने, व्यापार रोडावला आहे. हे असेच सुरू राहिले, तर व्यापारी देशोधडीला लागतील.- सुनील आब्बड, समन्वयक, व्यापारी महासंघकॅशलेसच्या आदेशामुळे कांदा व्यापारी शेतकºयांना चेकने पैसे चुकते करतात. धान्य बाजारात मात्र, छोटे व्यवहार असल्याने शेतकºयांना रोख पैसे मिळतात. कॅशलेस म्हणजे केवळ चेकने पैसे देणे नव्हे. त्याऐवजी व्यापारी एनईएफटी व डीडीद्वारेही शेतकºयांना पैसे देऊ शकतात. विंचूर उपबाजार आवारात व्यापारी एनईएफटीद्वारे शेतकºयांना पैसे देत आहेत.- बी. वाय. होळकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगावदररोज अडीच कोटींच्या कांद्याची खरेदीलासलगावला रोज साधारणपणे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. क्विंटलमागे सरासरी अडीच हजार रुपये भाव धरला, तर रोज २ कोटी ५० लाख रुपये शेतकºयांना वाटप केले जातात. ही रक्कम चेकने देण्यात येत आहे.