शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:44 IST

नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे.

योगेश बिडवईमुंबई : नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना चेकने पैसे देणेसुरू केल्याने, रोकड टंचाईमुळे गावातील व्यापार ठप्प झालाआहे. यामुळे लासलगावची दररोजची सुमारे दोन कोटींची उलाढालआता केवळ ५० लाखांवर आली आहे.सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटाबंदीनंतर गेल्या वर्षी रोकडअभावी कांदा मार्केट दोन महिने जवळपास बंद असल्यासारखी स्थिती होती. त्याचा व्यावसायिकांना फटका बसला. आता शेतकºयांना चेक देणे सुरू झाले आहे. ते पैसे दोन-तीन दिवसांत खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे कांदा विकल्यानंतर गावी जाण्यापूर्वी लासलगावातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शेतकºयांनी बंद केले आहे.लासलगाव येथील बाजारपेठेत किराणा, कापड, वाहनांचे स्पेअरपार्ट, खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे आदींचे डिलर्स आहेत. अपेक्षित व्यवसायाअभावी ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी एकत्र येत, त्यावर मार्ग काढण्यासाठी महासंघ स्थापन केला आहे.रोख व्यवहार हवेत‘कॅशलेस’च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्व व्यापाºयांनी शनिवारी बैठक घेतली. कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना किमान १० हजार रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी लासलगाव बाजार समितीकडे केली आहे.लाखो रुपये गुंतवणूक करून व्यापाºयांनी व्यवसाय सुरू केले. कांद्याचे व्यापारी चेकने पैसे देत असल्याने, व्यापार रोडावला आहे. हे असेच सुरू राहिले, तर व्यापारी देशोधडीला लागतील.- सुनील आब्बड, समन्वयक, व्यापारी महासंघकॅशलेसच्या आदेशामुळे कांदा व्यापारी शेतकºयांना चेकने पैसे चुकते करतात. धान्य बाजारात मात्र, छोटे व्यवहार असल्याने शेतकºयांना रोख पैसे मिळतात. कॅशलेस म्हणजे केवळ चेकने पैसे देणे नव्हे. त्याऐवजी व्यापारी एनईएफटी व डीडीद्वारेही शेतकºयांना पैसे देऊ शकतात. विंचूर उपबाजार आवारात व्यापारी एनईएफटीद्वारे शेतकºयांना पैसे देत आहेत.- बी. वाय. होळकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगावदररोज अडीच कोटींच्या कांद्याची खरेदीलासलगावला रोज साधारणपणे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. क्विंटलमागे सरासरी अडीच हजार रुपये भाव धरला, तर रोज २ कोटी ५० लाख रुपये शेतकºयांना वाटप केले जातात. ही रक्कम चेकने देण्यात येत आहे.