शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:44 IST

नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे.

योगेश बिडवईमुंबई : नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना चेकने पैसे देणेसुरू केल्याने, रोकड टंचाईमुळे गावातील व्यापार ठप्प झालाआहे. यामुळे लासलगावची दररोजची सुमारे दोन कोटींची उलाढालआता केवळ ५० लाखांवर आली आहे.सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटाबंदीनंतर गेल्या वर्षी रोकडअभावी कांदा मार्केट दोन महिने जवळपास बंद असल्यासारखी स्थिती होती. त्याचा व्यावसायिकांना फटका बसला. आता शेतकºयांना चेक देणे सुरू झाले आहे. ते पैसे दोन-तीन दिवसांत खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे कांदा विकल्यानंतर गावी जाण्यापूर्वी लासलगावातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शेतकºयांनी बंद केले आहे.लासलगाव येथील बाजारपेठेत किराणा, कापड, वाहनांचे स्पेअरपार्ट, खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे आदींचे डिलर्स आहेत. अपेक्षित व्यवसायाअभावी ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी एकत्र येत, त्यावर मार्ग काढण्यासाठी महासंघ स्थापन केला आहे.रोख व्यवहार हवेत‘कॅशलेस’च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्व व्यापाºयांनी शनिवारी बैठक घेतली. कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना किमान १० हजार रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी लासलगाव बाजार समितीकडे केली आहे.लाखो रुपये गुंतवणूक करून व्यापाºयांनी व्यवसाय सुरू केले. कांद्याचे व्यापारी चेकने पैसे देत असल्याने, व्यापार रोडावला आहे. हे असेच सुरू राहिले, तर व्यापारी देशोधडीला लागतील.- सुनील आब्बड, समन्वयक, व्यापारी महासंघकॅशलेसच्या आदेशामुळे कांदा व्यापारी शेतकºयांना चेकने पैसे चुकते करतात. धान्य बाजारात मात्र, छोटे व्यवहार असल्याने शेतकºयांना रोख पैसे मिळतात. कॅशलेस म्हणजे केवळ चेकने पैसे देणे नव्हे. त्याऐवजी व्यापारी एनईएफटी व डीडीद्वारेही शेतकºयांना पैसे देऊ शकतात. विंचूर उपबाजार आवारात व्यापारी एनईएफटीद्वारे शेतकºयांना पैसे देत आहेत.- बी. वाय. होळकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगावदररोज अडीच कोटींच्या कांद्याची खरेदीलासलगावला रोज साधारणपणे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. क्विंटलमागे सरासरी अडीच हजार रुपये भाव धरला, तर रोज २ कोटी ५० लाख रुपये शेतकºयांना वाटप केले जातात. ही रक्कम चेकने देण्यात येत आहे.