शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एसीबी, एसआयडीला पूर्णवेळ वाली नाहीच! सेवाज्येष्ठ कनकरत्नम यांना डावलले, अतुलचंद्र कुलकर्णीही सध्याच्याच पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:47 IST

ठाणे, पुणे, नवी मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांसह ११ अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करून राज्य सरकारने या वर्षातील पोलिसांच्या सर्व स्तरावरील बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला.

- जमीर काझीमुंबई : ठाणे, पुणे, नवी मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांसह ११ अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करून राज्य सरकारने या वर्षातील पोलिसांच्या सर्व स्तरावरील बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला. मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व राज्य गुप्त वार्ता विभागाचे (एसआयडी) प्रमुखपद पूर्णवेळ अधिकाºयांपासून रिक्त ठेवले आहे. अनुक्रमे दोन वर्षे व १६ महिन्यांपासून या पदांना पूर्णवेळ वाली मिळालेला नाही. त्याचप्रमाणे अपर महासंचालकामध्ये सर्वांत सेवाज्येष्ठ असलेल्या डी. कनकरत्नम यांना डावलण्यात आले आहे. तर एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनाही सध्याच्या पदावर कार्यरत ठेवण्यात आले आहे.‘एफएसएल’चे प्रमुख एस.पी. यादव हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत असून त्यानंतर कनकरत्नम यांना पदोन्नती तर कुलकर्णी यांच्याकडे अन्य महत्त्वाच्या विभागाची धुरा सोपविली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र प्रमुख दोन पदे रिक्त ठेवणे आणि अधिकाºयाला डावलण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे त्यांचा ‘पारदर्शी कारभार’ पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक यांच्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर महासंचालकपद शक्तिशाली मानले जाते. मुंबईचे आयुक्त वगळता अन्य सर्व आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांना त्यांना ‘रिपोर्टिंग’ करावे लागते. त्यामुळे या पदाची जबाबदारी मुख्यालयाच्या इमारतीतील ‘डीजी’नंतर सेवाज्येष्ठ असलेल्या अधिकाºयांवर सोपविली जाते.गेल्या वर्षी २१ डिसेंबरला तत्कालीन ‘एल अ‍ॅण्ड ओ’ बिपीन बिहारी यांची महासंचालकपदी बढती झाल्यानंतर त्या जागेवर त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेले नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम यांचा क्रमांक होता. त्यांची वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा वर्तवण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने या पदावर त्यांची निवड न करता बिहारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार ठेवला होता.सोमवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची या पदावर नियुक्ती केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्यापेक्षा एका वर्षाने ज्युनियर असलेले परमबीर सिंह यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.- राज्य पोलीस दलामध्ये पोलीस महासंचालक व मुंबईच्या आयुक्तपदानंतर महत्त्वाचे समजले जाणारे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपदही ३० जुलै २०१६ पासून रिक्त आहे. तर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी गेल्या वर्षीच्या १४ मार्चपासून पूर्णवेळ अधिकारी भरण्यात आलेला नाही. मुंबई आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे त्याचा अतिरिक्त प्रभार आहे. एसीबीचा अतिरिक्त पदभार फणसाळकर यांच्याकडे होता.

टॅग्स :Policeपोलिस