शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 14:07 IST

पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला.

ठळक मुद्देदेशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला. देशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित आहेत. तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंढरपूर येथे शेतकरी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी परिषदेसाठी ते आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी देशात, राज्यात सध्या सुरू असलेले विविध समाजाचे मोर्चे, शेतकºयांचा उद्रेक, कष्टकरी, असंघटित कामगारांचे विविध प्रश्न, शेतकºयांचा हमीभाव, कर्जमाफी या विषयी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.प्रत्येक राज्यात सुरू असलेले आरक्षणासाठीचे मोर्चे, सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकºयांचा उद्रेक, असंघटित कामगारांच्या समस्या, देशात वाढत असलेली विषमता, दुष्काळसदृश परिस्थिती याशिवाय अनेक मूलभूत सुविधांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे, पण तसे न करता सरकार जाणीवपूर्वक मोर्चे मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे, असे बाबा आढाव म्हणाले.---------------------कणखर भूमिका घ्यावीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र वेळोवेळी तडजोड, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यासह शेतकरी, कष्टकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या परराज्यातील लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते कणखर भूमिकेमुळे त्या राज्यांचे हित जोपासत आहेत. तशीच कणखर भूमिका शरद पवारांनी घेतल्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकरी, कष्टकºयांना निश्चित लाभ होईल, असे बाबा आढाव म्हणाले.