शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 14:07 IST

पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला.

ठळक मुद्देदेशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला. देशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित आहेत. तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंढरपूर येथे शेतकरी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी परिषदेसाठी ते आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी देशात, राज्यात सध्या सुरू असलेले विविध समाजाचे मोर्चे, शेतकºयांचा उद्रेक, कष्टकरी, असंघटित कामगारांचे विविध प्रश्न, शेतकºयांचा हमीभाव, कर्जमाफी या विषयी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.प्रत्येक राज्यात सुरू असलेले आरक्षणासाठीचे मोर्चे, सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकºयांचा उद्रेक, असंघटित कामगारांच्या समस्या, देशात वाढत असलेली विषमता, दुष्काळसदृश परिस्थिती याशिवाय अनेक मूलभूत सुविधांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे, पण तसे न करता सरकार जाणीवपूर्वक मोर्चे मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे, असे बाबा आढाव म्हणाले.---------------------कणखर भूमिका घ्यावीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र वेळोवेळी तडजोड, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यासह शेतकरी, कष्टकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या परराज्यातील लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते कणखर भूमिकेमुळे त्या राज्यांचे हित जोपासत आहेत. तशीच कणखर भूमिका शरद पवारांनी घेतल्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकरी, कष्टकºयांना निश्चित लाभ होईल, असे बाबा आढाव म्हणाले.