शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 14:07 IST

पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला.

ठळक मुद्देदेशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला. देशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित आहेत. तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंढरपूर येथे शेतकरी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी परिषदेसाठी ते आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी देशात, राज्यात सध्या सुरू असलेले विविध समाजाचे मोर्चे, शेतकºयांचा उद्रेक, कष्टकरी, असंघटित कामगारांचे विविध प्रश्न, शेतकºयांचा हमीभाव, कर्जमाफी या विषयी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.प्रत्येक राज्यात सुरू असलेले आरक्षणासाठीचे मोर्चे, सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकºयांचा उद्रेक, असंघटित कामगारांच्या समस्या, देशात वाढत असलेली विषमता, दुष्काळसदृश परिस्थिती याशिवाय अनेक मूलभूत सुविधांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे, पण तसे न करता सरकार जाणीवपूर्वक मोर्चे मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे, असे बाबा आढाव म्हणाले.---------------------कणखर भूमिका घ्यावीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र वेळोवेळी तडजोड, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यासह शेतकरी, कष्टकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या परराज्यातील लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते कणखर भूमिकेमुळे त्या राज्यांचे हित जोपासत आहेत. तशीच कणखर भूमिका शरद पवारांनी घेतल्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकरी, कष्टकºयांना निश्चित लाभ होईल, असे बाबा आढाव म्हणाले.