शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

By गणेश वासनिक | Updated: July 26, 2023 18:36 IST

लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली.

अमरावती : जनतेने निवडून दिलेल्या आमदार जेव्हा जनहिताच्या कामासाठी शासकीय कार्यालयात जातात, त्याचा जाब विचारतात तेव्हा लोकप्रतिनिधींवर शासकीय कामकामाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन भांदवी ३५३ च्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. मात्र जनतेचीच कामे जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधींना सहकार्य न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर अशी कार्यवाही करण्याची कोणतीच तरतुद नाही. याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांना यातून मुभा का देण्यात आली? असा प्रश्न आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित करुन हे कलम त्वरीत रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपला मुद्दा मांडतांना केली.

जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे निकाली काढण्याकरिता किंवा विविध विकासकामे का रखडली आहेत याचा शासकीय कार्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करुन त्या म्हणाल्या की, अशा प्रकारचे अनेक गुन्हे लोकप्रतिनिधींवर अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५ वर्षाची शिक्षा करण्याची तरतुद सुद्धा करण्यात आली आहे. मात्र नागरिकांची कामे अडवून ठेवणारे किंवा विकासकामाबाबत वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या अधिकाऱ्यावर याच धर्तीवर कार्यवाही होत नाही, ही बाब निश्चितपणे अनाकलनीय आहे. 

तर याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींपेक्षा वेगळ्या कॅटगरीत टाकण्यात आले आहे का? आणि हे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उपस्थित करुन या कलमातील तरतुदींचा फेरविचार करण्यासाठी यापुर्वी विधीमंडळ सदस्यांची कमिटी सुद्धा गठित करण्यात आली आहे. मात्र याबाबत आजवर कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. लोकप्रतिनिधीवर अशाप्रकारे गुन्हा दाखल होणे म्हणजे त्यांची एकप्रकारे गळचेपीच ठरत नाही का? या सर्व बाबींचा विचार करुन लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरvidhan sabhaविधानसभा