शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘अबकी बार, नीतेश आमदार’

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

नारायण राणेंचे भावनिक आवाहन : देवगड येथे काँग्रेसची प्रचारसभा

देवगड : ‘अबकी बार नीतेश आमदार’ असे भावनिक आवाहन देवगडवासीयांना करताना माजी पालकमंत्री व उद्योगमंत्री नारायण राणे हे अचानक पित्याच्या भूमिकेत गेलेले इंद्रप्रस्थ सभागृहातील प्रचारसभेमध्ये रविवारी सायंकाळी उपस्थितांनी पाहिले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय निरीक्षक व खासदार के. सुरेश, खासदार भालचंद्र मुणगेकर, उमेदवार नीतेश राणे, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. मिलिंद कुळकर्णी, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, सभापती डॉ. मनोज सारंग व अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी आपल्या घणाघाती भाषणात नारायण राणे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांसह भाजपा उमेदवार प्रमोद जठार यांच्यावर हल्ला चढविला. मोदी हे पंतप्रधान असूनही कुटुंबप्रमुखासारखे न वागता महाराष्ट्राच्या अस्मितेवरच घाव घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्र तोडून येथील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचा मोदींचा डाव असून जेएनपीटीसारखी बंदरे ओसाड पाडण्याची खेळी मोदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व महत्वाचे प्रकल्प, उदाहरणार्थ काश्मिरमधील रेल्वे, स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ही मनमोहन सरकारची गेल्या १० वर्षातील कामगिरी असताना फक्त उद्घाटनाचे धनी होऊन मोदी ‘आयत्या बिळावरचे नागोबा’ असल्याचा आरोप करीत फक्त खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे या मंत्राचा वापर आपल्या सर्व सभांमध्ये करीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.गेल्या ३० वर्षात देवगडमध्ये भाजपाचा आमदार असताना देवगड मालवण व कणकवली, कुडाळ यापेक्षा अनेकपट मागे असून त्याचे सर्व पाप याच आमदारांच्या नाकर्तेपणाची साक्ष असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. नीतेश हा तरुणाईचे प्रतिक असून त्यांचे आशास्थान बनेल व म्हणूनच त्याला देवगडवासीयांनी आता संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. मिलिंद कुळकर्णी यांनी आपल्या भाषणात नीतेश राणेंच्या विकासात्मक आराखडा, व्हिजन डॉक्युमेंट यांचा आढावा घेतला. तसेच संदेश पारकर, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, केंद्रीय पक्ष निरीक्षक के. सुरेश, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले.पराभवाचा वचपा काढाइंद्रप्रस्थ सभागृह खचाखच भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेर व कडेने शेकडो कार्यकर्ते उभे राहून भाषणे ऐकत होते. सभागृहस्थळी नारायण राणे यांचे सायंकाळी ५.३० वाजता आगमन झाल्यावर स्वागतपर घोषणांनी सभागृह दणाणून गेले. लोकसभेतील पराभवाचा वचपा यावेळी ५० हजारांच्या बहुमताने नीतेश यांना निवडून देऊन आपण काढा, असेही आवाहन नारायण राणे यांनी केले. (प्रतिनिधी)कृतीतून विकास घडवेन : नीतेश राणेयावेळी आपले विचार व्यक्त करताना नीतेश राणे म्हणाले की, भाजपा आमदाराने सर्व कामांचे खोटे श्रेय घेण्याव्यतिरिक्त आपल्या प्रगतीपुस्तकात काहीही नमूद केलेले नाही. तारामुंबरी पूल हा खासदार भालचंद्र मुणगेकरांच्या अथक प्रयत्नांचे फळ असून तत्कालीन खासदार नीलेश राणेंच्या पाठपुराव्याचे फलित आहे, याचे महत्त्व नीतेश राणेंनी अधोरेखित केले. देवगडमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी व सामान्य माणसाच्या भविष्याच्या उज्ज्वल वाटेसाठी मतदान करून आपल्याला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. देवगड-कणकवली व वैभववाडीसाठी स्वतंत्र विकास आराखडा व व्हिजन डॉक्युमेंट हे नुसते प्रचार तंत्र नसून प्रत्यक्ष काम करण्यासाठी प्रयत्नांचा लेखाजोखा आहे व त्याप्रमाणे काम करून दाखविण्याचा विश्वास त्यांनी जनतेला दिला. आपल्या प्रयत्नांमुळे व विकासकामांमुळे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना दखल घेऊन आपल्या मतदारसंघात सभा घेण्याची गरज पडावी यातच सर्व आहे, असे नीतेश राणे म्हणाले.