शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे पिकनिकच्या नावाखाली अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 18:52 IST

सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या दोन तरुणांना

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 19 : सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या दोन तरुणांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी मोठया कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्या तिसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरणानंतर घरी परतलेल्या एका मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या १४ तासांमध्ये उर्वरित दोघींची सुखरुपपणे सुटका केल्याने त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सौरभ सुंदर आबोरे (१८), खलील जावेद खान (१९) आणि धीरज (१६, रा. तिघेही ओवळा, कासारवडवली, ठाणे) अशी याप्रकरणी अटक केलेल्या तीन कथित आरोपींची नावे आहेत. खलीतची सिद्धेश्वर तलाव भागातील शिवांगी (१६, नावात बदल आहे) या मुलीशी अलिकडेच ओळख झाली होती. त्याने धीरज आणि सौरभ या अन्य दोन मित्रांशी तिच्या १३ आणि १६ वर्षांच्या मैत्रिणींशी ओळख घडवून आणली.

गेल्या १५ दिवसांतच मैत्री झाल्याची संधी साधून या तीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना १७ जुलै रोजी सौरभच्या घरी पार्टी करण्याचे अमिष दाखविले. रात्री ११ पर्यंत परत आणून सोडू, असेही त्यांना सांगितल्याने त्यांनी तयारी दर्शविली. त्यांना दुचाकीवरुन घेऊन हे सायंकाळी ४ वा. च्या सुमारास सिद्धेश्वर तलाव भागातून गेले. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिथे पार्टी केली. जेवण केले. त्याबरोबर मुलींना त्यांनी आग्रह करुन बियरही पाजली. रात्री ९.३० ते पहाटे ४.३० पर्यंत नृत्य करीत त्यांच्याशी गैरवर्तनही केले. नशेत असल्यामुळे या मुलींनाही कसलेच भान राहिले नाही. इकडे मुलींच्या पालकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर तलाव भागात गर्दी झाल्याचे पाहून नौपाडा पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने याबाबतची चौकशी केली, तेंव्हा तीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली. यातील एका मुलीच्या वडीलांनी एका दुचाकीस्वाराबरोबर मुलीला जातांना पाहिलेही होते. परंतू, दुचाकीचा क्रमांक नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा संभ्रम वाढला होता. रात्री ११ पर्यंत मुली घरी न परतल्यामुळे अखेर याप्रकरणी तीन्ही मुलींच्या पालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. उपनिरीक्षक तृप्ती खळदे आणि प्रशांत लोंढे या दोन पथकांनी शहरातील वेगवेगळया भागासह त्यांचे मित्र, मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली. त्यांचे मोबाईल, व्हाटसअ‍ॅप, फेसबुक अकाउंटही तपासण्यात आले. दरम्यान, १८ जुलै रोजी (मंगळवारी) या तिघींपैकी एक १३ वर्षाची मुलगी घरी परतली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली तेंव्हा या ‘पार्टी’ प्रकरणाचा उलगडा झाला. तोपर्यंत या मुलांनी मुलींबरोबर मौज केल्यानंतर उपवन परिसरात त्यांना पहाटे ५ वा. च्या दरम्यान घेऊन गेले.

सकाळी ६ वा. च्या दरम्यान उपनिरीक्षक लोंढे, खळदे आणि महिला हवालदार फर्नांडीस यांनी सौरभचे घर गाठले. घरात झडती घेतली, तिथे त्यांना आक्षेपार्ह साधनांसह दारुच्या बाटल्याही मिळाल्या. पण या मुलीं मिळाल्या नाही. त्यांचे मोबाईल बंद असतांनाही उपनिरीक्षक केकाण यांच्या मदतीने टॉवर लोकेशन घेऊन उपनिरीक्षक लोंढे यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उपवन भागातून ताब्यात घेतले. संपूर्ण चौकशीनंतर रात्री ८.३० वा.च्या सुमारास सौरभ आणि खलीत यांना अटक केली. तर धीरजला मात्र बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण (३६३), विनयभंग (३५४) आणि पोक्सो -८ (अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे तसेच गैरवर्तन) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन्ही मुलींना आता वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे याबाबतचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी ‘लोकमत’ सांगितले.