शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अभंगवाणीने येते जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 01:32 IST

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उपनगरामधील मंदिरामध्ये काकडारती सुरू झाली आहे.

रहाटणी : सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उपनगरामधील मंदिरामध्ये काकडारती सुरू झाली आहे. अगदी पहाटे गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुण या काकडारतीत सहभागी होताना दिसून येत आहेत.रहाटणी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर, राम मंदिर व नखाते वस्ती येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तर पिंपळे सौदागर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडारती सुरू आहे. अगदी पहाटेपासून गोड अभंगाचे सूर परिसरात घुमू लागल्याने परिसरात भक्तिमय वातावरण दिसू लागले आहेत, तर अनेक नागरिक अभंगाचा ध्वनी कानी पडू लागल्याने समाधान व्यक्त करीत आहेत. ही काकडारती खऱ्या अर्थाने कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धती प्रचलित आहे. सिमेंटच्या जंगलात परंपरा कायम पूर्वी गावागावांत मातीत बांधलेले मंदिर होते. सध्या याच मंदिराचा जीर्णोद्धार करून सिमेंटने बांधण्यात आले आहेत. तसेच उपनगरात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. काकडारती ही अगदी पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा आहे. गावातील अनेक रूढी-परंपरा कालबाह्य होत असताना मात्र ही परंपरा अनेक गावांनी जोपासली आहे. मंदिरातील सप्ताह, पारायण यासह काकडारती परंपरा अद्यापही जोपासली आहे. (वार्ताहर)>विठ्ठलनगरमधील पुर्नवसन केंद्रात कार्यक्रमनेहरूनगर : विठ्ठलनगर पुनर्वसन येथील श्री हनुमान हौसिंग सोसायटी इमारत क्रमांक १३ येथे या वर्षीही काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळ असलेल्या विठ्ठलनगर पुनर्वसन येथील हनुमान हौसिंग सोसायटी इमारत क्रमांक १३ येथे या वर्षी काकडा आरतीचे आयोजन केले आहे. काकडारतीला १६ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, काकडारतीचे यंदाचे ३८वे वर्ष आहे. या सप्ताहात प्रत्येक दिवशी कीर्तन व दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. सप्ताहात दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विघ्नहर्ता प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी उडाफे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले आहे.>खडकीकरांना जपली परंपराखडकी : येथील दर्जी गल्लीमधील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व गाडीअड्डा येथील प्राचीन एकमुखी दत्तमंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंड महिनाभर काकडारती केली जाते. या वेळी खडकीतील वातावरण भक्तिमय होऊन सकाळच्या प्रहरी प्रसन्न होते. खडकीतील भक्तमंडळी एकत्र येऊन भजन करतात. सकाळी आठ वाजेपर्यंत भजन-कीर्तन होते. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. तसेच गाडीअड्डा येथील मंदिरातही विशेष करून तरुण वर्ग पुढाकार घेऊन काकडा आरती परंपरेनुसार सुरू ठेवत आहे. विठ्ठल-रखुमाई मंदिरात हभप विजय लक्कामहाराज सर्व आयोजन करतात. कैलास गायकवाड, विठ्ठल साकुरे, जयसिंग काळे, बबन पांडकर, सुरेश माईनंदाकर, चांगुणाबाई गायकवाड, शरयू खांदोडे, कमल घाडगे, शकुंतला गरसुंद व विठ्ठल-रखुमाई भजनी महिला मंडळ, तसेच गाडीअड्डा येथील दत्ता सावंत, नारायण पवार, सुशील पवार, दीपक लोंढे, हृषीकेश आदमाने यांचे सहकार्य लाभते. >काळेवाडीकरांची काकडा आरतीने होते सुप्रभात काळेवाडी : येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने नढेनगरमधील विठ्ठल मंदिरामध्ये तसेच जोतिबा कामगार मित्र मंडळ आयोजित विठ्ठल-रुक्मिणी कॉलनीमधील विठ्ठल मंदिरामध्ये आणि हभप मारुती नढे पाटील व नवनाथ नढे पाटील यांच्या सहकार्याने विठ्ठलराज भजनी मंडळ आयोजित विष्णुराज कार्यालयामध्ये दर वर्षी काकडारतीचे आयोजन केले जात आहे. >अभंगवाणीने येते जागदिघी : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच काकड्याला सुरुवात होते. अभंग, गौळणी, मालिका, पांगळा, आंधळा, पहिले मंगलाचरण, दुसरे मंगलाचरण, काकडा अभंग, भूपाळी अभंग, वासुदेव, जोगी, दळण, मुका, बहिरा, विनवणी, पांडुरंगाची स्तुती, उपसंहाराचे अभंग, भारूडातून नामस्मरण केले जाते.