शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

आबा, दादा, बाबा भाडोत्री कलाकार : गडकरी

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

कऱ्हाड दक्षिण : भाजपचे अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत कडाडून टीका

कऱ्हाड : ‘आघाडी शासनाने जनतेला पावाचा एक तुकडा देऊन गरिबी हटवायचा नारा दिला. कारखानदारी संपुष्टात आणली. दादा, आबा, बाबा हे नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार आहेत,’ अशी टीका केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड, डॉ. सुरेश भोसले, नगरसेवक विनायक पावस्कर, महादेव पवार, विक्रम पावस्कर, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे, नगरसेवक जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘विधानसभेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात महत्त्वाची आहे. कारण सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी खर्च केलेत; पण ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, त्यावेळी समोर आलेला सिंचनाचा आकडा धक्कादायक होता. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंमुळे कुप्रसिद्ध झालेले राज्य आहे. युती सरकार असताना या राज्यात भारनियमन नव्हते; पण सध्या गावागावांत लोडशेडिंग सुरू आहे.’ ‘माझी आई आमदार किंवा वडील खासदार नव्हते. पोस्टर चिटकविणारा मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. मात्र, तरीही सामान्यांचा नेता झालो. नरेंद्र मोदी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले. कुणाच्याही कृपेने आम्ही निवडून आलेलो नाही. तिकडे मात्र आमदारांच्या पोटी आमदार जन्म घेतो आणि खासदारांच्या पोटी खासदारच जन्माला येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर ते मिर्झाराजे जयसिंगांचे. निवडणुकीनंतर या आबा, दादा आणि बाबांच्या गाड्या भंगारात विकाव्या लागतील; पण तेथेही त्याला किंमत मिळणार नाही. काँग्रेसची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे,’ असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्या २५ कोटींचं काय झालं ?‘कऱ्हाडला अठराशे कोटी दिल्याचे माजी मुख्यमंत्री सांगतायत; पण साडेचारशे कोटींत मंगळावर यान जात असेल, तर अठराशे कोटींची त्यांनी असली कसली कामे केली? मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड नगरपालिकेला २५ कोटी देतो म्हणून सांगितले होते; पण प्रत्यक्षात एक रुपयाही दिलेला नाही. नितीन गडकरी सहावेळा निवडून आले आणि हे तीनवेळा. मग मोठे कोण, आणि कोणी जास्त निवडणुका लढवल्या याचा विचारही त्यांनीच करावा,’ असेही डॉ. अतुल भोसले म्हणाले.