शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आबा, दादा, बाबा भाडोत्री कलाकार : गडकरी

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

कऱ्हाड दक्षिण : भाजपचे अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत कडाडून टीका

कऱ्हाड : ‘आघाडी शासनाने जनतेला पावाचा एक तुकडा देऊन गरिबी हटवायचा नारा दिला. कारखानदारी संपुष्टात आणली. दादा, आबा, बाबा हे नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार आहेत,’ अशी टीका केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड, डॉ. सुरेश भोसले, नगरसेवक विनायक पावस्कर, महादेव पवार, विक्रम पावस्कर, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे, नगरसेवक जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘विधानसभेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात महत्त्वाची आहे. कारण सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी खर्च केलेत; पण ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, त्यावेळी समोर आलेला सिंचनाचा आकडा धक्कादायक होता. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंमुळे कुप्रसिद्ध झालेले राज्य आहे. युती सरकार असताना या राज्यात भारनियमन नव्हते; पण सध्या गावागावांत लोडशेडिंग सुरू आहे.’ ‘माझी आई आमदार किंवा वडील खासदार नव्हते. पोस्टर चिटकविणारा मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. मात्र, तरीही सामान्यांचा नेता झालो. नरेंद्र मोदी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले. कुणाच्याही कृपेने आम्ही निवडून आलेलो नाही. तिकडे मात्र आमदारांच्या पोटी आमदार जन्म घेतो आणि खासदारांच्या पोटी खासदारच जन्माला येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर ते मिर्झाराजे जयसिंगांचे. निवडणुकीनंतर या आबा, दादा आणि बाबांच्या गाड्या भंगारात विकाव्या लागतील; पण तेथेही त्याला किंमत मिळणार नाही. काँग्रेसची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे,’ असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्या २५ कोटींचं काय झालं ?‘कऱ्हाडला अठराशे कोटी दिल्याचे माजी मुख्यमंत्री सांगतायत; पण साडेचारशे कोटींत मंगळावर यान जात असेल, तर अठराशे कोटींची त्यांनी असली कसली कामे केली? मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड नगरपालिकेला २५ कोटी देतो म्हणून सांगितले होते; पण प्रत्यक्षात एक रुपयाही दिलेला नाही. नितीन गडकरी सहावेळा निवडून आले आणि हे तीनवेळा. मग मोठे कोण, आणि कोणी जास्त निवडणुका लढवल्या याचा विचारही त्यांनीच करावा,’ असेही डॉ. अतुल भोसले म्हणाले.