शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

आबा, दादा, बाबा भाडोत्री कलाकार : गडकरी

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

कऱ्हाड दक्षिण : भाजपचे अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत कडाडून टीका

कऱ्हाड : ‘आघाडी शासनाने जनतेला पावाचा एक तुकडा देऊन गरिबी हटवायचा नारा दिला. कारखानदारी संपुष्टात आणली. दादा, आबा, बाबा हे नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार आहेत,’ अशी टीका केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड, डॉ. सुरेश भोसले, नगरसेवक विनायक पावस्कर, महादेव पवार, विक्रम पावस्कर, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे, नगरसेवक जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘विधानसभेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात महत्त्वाची आहे. कारण सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी खर्च केलेत; पण ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, त्यावेळी समोर आलेला सिंचनाचा आकडा धक्कादायक होता. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंमुळे कुप्रसिद्ध झालेले राज्य आहे. युती सरकार असताना या राज्यात भारनियमन नव्हते; पण सध्या गावागावांत लोडशेडिंग सुरू आहे.’ ‘माझी आई आमदार किंवा वडील खासदार नव्हते. पोस्टर चिटकविणारा मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. मात्र, तरीही सामान्यांचा नेता झालो. नरेंद्र मोदी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले. कुणाच्याही कृपेने आम्ही निवडून आलेलो नाही. तिकडे मात्र आमदारांच्या पोटी आमदार जन्म घेतो आणि खासदारांच्या पोटी खासदारच जन्माला येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर ते मिर्झाराजे जयसिंगांचे. निवडणुकीनंतर या आबा, दादा आणि बाबांच्या गाड्या भंगारात विकाव्या लागतील; पण तेथेही त्याला किंमत मिळणार नाही. काँग्रेसची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे,’ असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्या २५ कोटींचं काय झालं ?‘कऱ्हाडला अठराशे कोटी दिल्याचे माजी मुख्यमंत्री सांगतायत; पण साडेचारशे कोटींत मंगळावर यान जात असेल, तर अठराशे कोटींची त्यांनी असली कसली कामे केली? मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड नगरपालिकेला २५ कोटी देतो म्हणून सांगितले होते; पण प्रत्यक्षात एक रुपयाही दिलेला नाही. नितीन गडकरी सहावेळा निवडून आले आणि हे तीनवेळा. मग मोठे कोण, आणि कोणी जास्त निवडणुका लढवल्या याचा विचारही त्यांनीच करावा,’ असेही डॉ. अतुल भोसले म्हणाले.