शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आबा, दादा, बाबा भाडोत्री कलाकार : गडकरी

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

कऱ्हाड दक्षिण : भाजपचे अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत कडाडून टीका

कऱ्हाड : ‘आघाडी शासनाने जनतेला पावाचा एक तुकडा देऊन गरिबी हटवायचा नारा दिला. कारखानदारी संपुष्टात आणली. दादा, आबा, बाबा हे नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार आहेत,’ अशी टीका केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड, डॉ. सुरेश भोसले, नगरसेवक विनायक पावस्कर, महादेव पवार, विक्रम पावस्कर, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे, नगरसेवक जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘विधानसभेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात महत्त्वाची आहे. कारण सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी खर्च केलेत; पण ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, त्यावेळी समोर आलेला सिंचनाचा आकडा धक्कादायक होता. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंमुळे कुप्रसिद्ध झालेले राज्य आहे. युती सरकार असताना या राज्यात भारनियमन नव्हते; पण सध्या गावागावांत लोडशेडिंग सुरू आहे.’ ‘माझी आई आमदार किंवा वडील खासदार नव्हते. पोस्टर चिटकविणारा मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. मात्र, तरीही सामान्यांचा नेता झालो. नरेंद्र मोदी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले. कुणाच्याही कृपेने आम्ही निवडून आलेलो नाही. तिकडे मात्र आमदारांच्या पोटी आमदार जन्म घेतो आणि खासदारांच्या पोटी खासदारच जन्माला येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर ते मिर्झाराजे जयसिंगांचे. निवडणुकीनंतर या आबा, दादा आणि बाबांच्या गाड्या भंगारात विकाव्या लागतील; पण तेथेही त्याला किंमत मिळणार नाही. काँग्रेसची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे,’ असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्या २५ कोटींचं काय झालं ?‘कऱ्हाडला अठराशे कोटी दिल्याचे माजी मुख्यमंत्री सांगतायत; पण साडेचारशे कोटींत मंगळावर यान जात असेल, तर अठराशे कोटींची त्यांनी असली कसली कामे केली? मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड नगरपालिकेला २५ कोटी देतो म्हणून सांगितले होते; पण प्रत्यक्षात एक रुपयाही दिलेला नाही. नितीन गडकरी सहावेळा निवडून आले आणि हे तीनवेळा. मग मोठे कोण, आणि कोणी जास्त निवडणुका लढवल्या याचा विचारही त्यांनीच करावा,’ असेही डॉ. अतुल भोसले म्हणाले.