शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

सेनामंत्र्यांचा अबोला

By admin | Updated: June 22, 2015 03:17 IST

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

संदीप प्रधान, मुंबईशिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आपापसात संवाद फारच कमी असल्याचे शिवसेनेच्याच काही मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळ बैठकीकरिता एकमेकांच्या शेजारी बसूनही ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्र बसून स्ट्रॅटेजी पक्की करणे हे तर होतच नाही. मागील सरकारमध्ये कुठली भूमिका घ्यायची किंवा एखादा ताजा विषय कसा व कुणी उपस्थित करायचा याची व्यूहरचना निश्चित करीत. शिवसेनेत ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याने अशी ठरवून भूमिका घेतली जात नाही.रावते व कदम हे दोघे विधान परिषदेचे सदस्य आहेत. रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य झाल्यापासून उभयतांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला. निवडणुकीत सुभाष देसाई हे पराभूत झाले. त्यानंतरही त्यांना मंत्री केले व उद्योगासारखे सर्वांत महत्त्वाचे खाते दिल्याने रावते व कदम हे देसाई यांच्यावर नाराज आहेत. भाजपासोबतच्या वाटाघाटींमध्ये देसाईच सहभागी होत असल्याने तो मंत्र्यांमधील कटुतेचा पदर आहे.