शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सेनामंत्र्यांचा अबोला

By admin | Updated: June 22, 2015 03:17 IST

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

संदीप प्रधान, मुंबईशिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आपापसात संवाद फारच कमी असल्याचे शिवसेनेच्याच काही मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळ बैठकीकरिता एकमेकांच्या शेजारी बसूनही ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्र बसून स्ट्रॅटेजी पक्की करणे हे तर होतच नाही. मागील सरकारमध्ये कुठली भूमिका घ्यायची किंवा एखादा ताजा विषय कसा व कुणी उपस्थित करायचा याची व्यूहरचना निश्चित करीत. शिवसेनेत ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याने अशी ठरवून भूमिका घेतली जात नाही.रावते व कदम हे दोघे विधान परिषदेचे सदस्य आहेत. रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य झाल्यापासून उभयतांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला. निवडणुकीत सुभाष देसाई हे पराभूत झाले. त्यानंतरही त्यांना मंत्री केले व उद्योगासारखे सर्वांत महत्त्वाचे खाते दिल्याने रावते व कदम हे देसाई यांच्यावर नाराज आहेत. भाजपासोबतच्या वाटाघाटींमध्ये देसाईच सहभागी होत असल्याने तो मंत्र्यांमधील कटुतेचा पदर आहे.