शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

आष्टी पुलावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : धुळीचा त्रास वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत.आष्टी परिसरातील हा एकमेव पूल असल्याने या परिसरातील अनेक नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, चंद्रपूरकडे जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या अनेक ट्रक आष्टी मार्गेच बल्लारशाला जातात. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. आष्टी पुलाची उंची अतिशय कमी आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने अनेकवेळा या पुलावरून पाणी वाहत होते. पाणी वाहल्यामुळे येथील डांबर निघून जाऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत दुरूस्ती करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन सदर मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. या धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डोळ्यात धूळ गेल्याने वाहनचालकाचा तोल जाऊन वाहनासह चालक नदीच्या पात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.