शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आष्टी पुलावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : धुळीचा त्रास वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत.आष्टी परिसरातील हा एकमेव पूल असल्याने या परिसरातील अनेक नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, चंद्रपूरकडे जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या अनेक ट्रक आष्टी मार्गेच बल्लारशाला जातात. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. आष्टी पुलाची उंची अतिशय कमी आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने अनेकवेळा या पुलावरून पाणी वाहत होते. पाणी वाहल्यामुळे येथील डांबर निघून जाऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत दुरूस्ती करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन सदर मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. या धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डोळ्यात धूळ गेल्याने वाहनचालकाचा तोल जाऊन वाहनासह चालक नदीच्या पात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.