शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शीना बोराच्या हत्येला आरुषी प्रकरण बनू देणार नाही - राकेश मारिया

By admin | Updated: September 6, 2015 09:37 IST

शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. ३० सप्टेंबरला मला बढती मिळणार असून त्यापूर्वीच मला इंद्राणी प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करुन ठेवायचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. 

शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणा-या राकेश मारिया यांनी रविवारी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी शीना बोरा प्रकरणावर भाष्य केले. प्रसारमाध्यम स्वतःच इंद्राणी प्रकरणात चौकशी करत असून त्यांच्यामुळे आम्हाला पुरावे गोळा करण्यात अडचणी होत आहेत असा आरोप त्यांनी केला. शीनाची हत्या तीन वर्षांपूर्वी झाल्याने पुरावे गोळा करताना अडचणी येत आहेत. दहशतवाद्याची चौकशी करताना संयम ठेवावे लागत नाही, पण इंद्राणी उच्चशिक्षीत आहे हेच आमच्यासमोरील आव्हान आहे. मुंबई पोलिसांनी बेस्ट टीम या प्रकरणाचा तपास करत आहे, हे पथक गेल्या अनेक दिवसांपासून घरीदेखील गेले नाहीत असेही त्यांनी सांगितले.