शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

आरे कॉलनीत सरसकट बांधकाम होणार नाही

By admin | Updated: February 26, 2015 02:53 IST

आरे कॉलनीच्या जमिनीवर मेट्रोचे कारशेड व अन्य शासकीय प्रकल्प वगळता सरसकट बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही,

मुंबई : आरे कॉलनीच्या जमिनीवर मेट्रोचे कारशेड व अन्य शासकीय प्रकल्प वगळता सरसकट बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. बृहन्मुंबईचा विकास आराखडा २०१५च्या वर्षअखेरपर्यंत अंतिम व्हावा, अशी आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरेच्या जमिनीवर सरकारी व महापालिकेचे विकासाचे प्रस्ताव गुणवत्तेच्या निकषात बसत असतील तर अमलात आणले जातील. महापालिकेने तयार केलेला हा प्रस्तावित विकास आराखडा अंतिम नाही. यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्याची सुनावणी करण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती असेल. त्यांनी घेतलेला निर्णय महापालिका सभागृहापुढे जाईल व मंजूर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारची छाननी समिती तो विकास आराखडा तपासून मुख्यमंत्री या नात्याने अंतिम मंजुरीकरिता आपल्याकडे पाठवेल. ही प्रक्रिया वर्षअखेरपर्यंत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. सध्या बृहन्मुंबईत वेगवेगळ््या विकास नियंत्रण नियमावली अमलात आणली जाते. पर्यावरण विभागाबरोबर सल्लामसलत करून एकच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याचे निर्देश महापालिकेला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.राज्याचे गृहनिर्माण धोरण ‘यशदा’ला तयार करण्यास सांगितले आहे. त्यावर सर्व विभागांचे अभिप्राय घेतले जातील. राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण धोरण मंजूर झाल्यावर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण राज्याकरिता एकच विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण अमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु बृहन्मुंबई व अन्य शहरे यांच्यातील परिस्थितीत फरक असल्याचे फडणवीस यांनी कबुल केले. (विशेष प्रतिनिधी)