शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी विशेष उपक्रम, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा शासनासह पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:01 IST

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल.

मुंबई : पर्यटनाची पारंपरिक व्याख्या बदलण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवा उपक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाच्या पर्यटन विभागासह आता अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. 

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल. यात कांदळवनांपासून ते ऐतिहासिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील अन्य घटकांसह स्थानिक प्रशासनालाही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी अशा पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा, निवास, पर्यटन सुविधा, पर्यटकांचा या भागात होणारा ओघ, प्रवास आणि पर्यटनाची शाश्वतता, जबाबदार पर्यटन, स्थानिक समुदायाचा सहभाग, संवेदना आणि सेवा पुरवठादारांचे प्रशिक्षण यासह विविध पैलूंवर भर देण्यात येणार आहे.

वर्षभर विविध उपक्रमांवर भरराज्याला सुमारे ७२० किमीचा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच राज्यभरात उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक अन्य क्षेत्रात करत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षभर या उपक्रमावर काम केले जाणार आहे. यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध काम करणा-या संस्था व शासन यांमध्ये समन्वयाने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर नेण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

टॅग्स :tourismपर्यटन