शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी विशेष उपक्रम, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा शासनासह पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:01 IST

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल.

मुंबई : पर्यटनाची पारंपरिक व्याख्या बदलण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवा उपक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाच्या पर्यटन विभागासह आता अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. 

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल. यात कांदळवनांपासून ते ऐतिहासिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील अन्य घटकांसह स्थानिक प्रशासनालाही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी अशा पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा, निवास, पर्यटन सुविधा, पर्यटकांचा या भागात होणारा ओघ, प्रवास आणि पर्यटनाची शाश्वतता, जबाबदार पर्यटन, स्थानिक समुदायाचा सहभाग, संवेदना आणि सेवा पुरवठादारांचे प्रशिक्षण यासह विविध पैलूंवर भर देण्यात येणार आहे.

वर्षभर विविध उपक्रमांवर भरराज्याला सुमारे ७२० किमीचा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच राज्यभरात उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक अन्य क्षेत्रात करत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षभर या उपक्रमावर काम केले जाणार आहे. यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध काम करणा-या संस्था व शासन यांमध्ये समन्वयाने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर नेण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

टॅग्स :tourismपर्यटन