शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

स्वप्नातले आलिशान घर कागदावरच; साकीनाका, विलेपार्ले, कांदिवलीत ८ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 07:11 IST

दुसऱ्या घटनेत, विलेपार्ले परिसरात राहणारे मनीष गुजराती (४३) यांची दिलीप अमृतलाल ध्रुव, शुभांग दिलीप ध्रुव यांनी सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई - आलिशान घराच्या स्वप्नात विलेपार्ले, साकीनाका आणि कांदिवलीतील रहिवाशांना जवळपास आठ कोटींहून अधिकचा फटका बसला आहे. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनी, संचालक आणि विकासकांविरूद्ध गुरुवारी तीन स्वतंत्र  गुन्हे नोंदविण्यात आले असून, पोलिस अधिक  तपास करत आहेत. 

गोरेगाव परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी आठवले (७३) यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी जयेश विनोद तन्ना, दीप विनोद तन्ना आणि विवेक जयेश तन्ना या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आपली जवळपास सव्वा कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. गोरेगाव सिद्धार्थनगर येथील कपिलवस्तू को-ऑप. हौ. सोसायटी येथे ३०१ क्रमांकाचा फ्लॅट खरेदीसाठी साई सिटी डेव्हलपर्स एस्कटिक प्रायव्हेट लिमिटेड यांना चेकद्वारे पैसे पाठवले. मात्र, ठरल्याप्रमाणे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन त्यांच्या नावावर न करता, तो फ्लॅट दुसऱ्याला विक्री केल्याचे आरोपात नमूद आहे. त्या फ्लॅटवर ९८ लाख ८० हजार रुपयांचे लोन करून ती रक्कमही जयेशने घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, विलेपार्ले परिसरात राहणारे मनीष गुजराती (४३) यांची दिलीप अमृतलाल ध्रुव, शुभांग दिलीप ध्रुव यांनी सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विलेपार्ले पूर्वेकडील विघ्नेश्वर सोसायटीत ८०२ क्रमांकाच्या फ्लॅटसाठी २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मेसर्स बिनिता यांनी या फ्लॅटच्या बदल्यात परिसरातील दुसऱ्या ठिकाणी, १८७० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. याबाबत वारंवार विचारणा करूनही फ्लॅट दिला नाही. पैसेही परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

तिसऱ्या घटनेत जुहू तारा रोड येथील रहिवासी मनमोहन घुवालेवाला (६०) यांच्या तक्रारीवरून राजेश मधानी (५२) व त्यांची पत्नी रुपल मधानी (५०) यांच्याविरूद्ध साकीनाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. घुवालेवाला यांच्या तक्रारीनुसार, मधानी दाम्पत्याने कांदिवलीत निवासी इमारत बांधत असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून ५ कोटी ३३ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, डिसेंबर २०१८ ते अद्याप बांधकामही सुरू न केल्याने त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. मात्र, पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.