शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी तब्बल पावणेदहा टक्के दराने २८ हजार कोटींचे कर्ज!

By नारायण जाधव | Updated: September 23, 2022 16:29 IST

samruddhi highway : सार्वजनिक बांधकाम खात्याने या महामार्गाच्या वित्तीय आराखड्यातील बदलास शुक्रवारी मान्यता दिली. त्यात तपशील दिला आहे.

नवी मुंबई : मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले असून त्याची परतफेड टोलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मात्र, बाजारात जागतिक बँकेसह एशियन डेव्हलपमेंट बँकेपासून जपानच्या जायका इंटरनॅशनल सारख्या संस्था १ ते ते तीन-साडेपाच टक्के दराने कर्ज देत असताना एमएसआरडीसीने या कर्जावर तब्बल पावणेदहा टक्के दराने व्याज देण्याची तयारी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कर्जाची परतफेडीची मुदत २५ वर्षांची आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या महामार्गाच्या वित्तीय आराखड्यातील बदलास शुक्रवारी मान्यता दिली. त्यात तपशील दिला आहे.

८८०९.७४ कोटींची अर्थसहाय्य सूटयाशिवाय, महामार्गाची प्रकल्प किंमत कमी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने २३१३ कोटी ५६ लाख रॉयलटीत सूट दिली आहे. तसेच महामार्ग पूर्ण होऊन टोल सुरू होईपर्यंत या कर्जावर ६३९६ कोटी १८ लाख व्याज रस्ते विकास महामंडळ देणार आहे.

या १३ बॅंकांकडून घेतले कर्जएसबीआय ८ हजार कोटी, युनियन बँक १७०० कोटी, बँक ऑफ इंडिया १७०० कोटी, इंडियन बँक ७५० कोटी, इंडियन इन्फ्रा फायनन्स कंपनी १३०० कोटी,बँक ऑफ बडोदा १५०० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र एक हजार कोटी, सिंडिकेट बँक व ओरिएंट बँक प्रत्येकी ५०० कोटी, कॅनरा बँक चार हजार कोटी, हुडको २५५० कोटी, युबीआय १५०० कोटी आणि पंजाब नॅशनल बँक तीन हजार कोट

महामंडळांसह जमीन विक्रीतून २७ हजार ३३५ कोटीरस्ते विकास महामंडळाच्या साडेतीन हजार कोटींसह राज्य शासनच्या मालकीची सिडको, एमएमआरडीए व इतर महामंडळांकडून साडेपाच हजार कोटी, रॉयल्टी सूट २४१४ कोटी, आयडीसी ६३९६ कोटी आणि जमीन विक्रीतून ९५२५ कोटी असा २७३३५ कोटी रुपये निधी रुपये उभा केला आहे. यातील महामंडळांच्या कर्जाचे यापूर्वीच शेअरमध्ये रुपांतर केले आहे.

हा आहे आराखड्यातील वित्तीय बदलशासनाच्या २०१९ च्या निर्णयानुसार मार्च २०२२ पर्यंत भाग भांडवल म्हणून ८५०० कोटी आणि बांधकाम कर्जावरील व्याजाचे ६३९६ कोटी १८ लाख येणे अपेक्षित होते. तसेच १५ जुलै २३ पर्यंत २३९६ कोटी १८ लाख रुपये लागणार आहेत. परंतु, प्रत्यक्षात भाग भांडवल म्हणून ३५०० कोटी आणि व्याजाचे साडेचार हजार कोटी भरले आहेत. उर्वरित चार कोटी रुपये येणे आहे. ते वेळेवर वेळेवर न दिल्यास व्याज वाढण्याची शक्यता आहे. तसेच जमीन विक्रीतून उभारण्यात येणारे ९५२५ कोटी अद्याप उभे केलेले नाहीत. यामुळे हा निधी देण्याच्या या सर्व वित्तीय बदलास मान्यता शुक्रवारी मान्यता दिली.

पावणेदहा टक्के व्याजदरावर प्रश्नचिन्हजपानच्या जायका इंटरनॅशनलने बुलेट ट्रेनसाठी ८८ हजार कोटींचे कर्ज अवघ्या ०.१ टक्का दराने ५० वर्षांकरिता दिले आहे. जागतिक बँकेसह एशिनय डेव्हलपमेंट बँकेनेही एमएमआरडीएसह राज्याच्या कृषी विभागाच्या अनेक उपक्रमांना अतिशय कमी व्याजदराने कर्ज दिले आहे. असे असताना १३ भारतीय बँकांकडून तब्बल पावणेदहा टक्के दराने कर्ज घेण्याच्या एमएसआरडीसीच्या धोरणाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग