शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग

By अमेय गोगटे | Updated: September 29, 2024 08:24 IST

उच्च न्यायालयाने अलीकडेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सुधारित नियम घटनाबाह्य ठरवले. कुणाल कामरा आणि एडिटर्स गिल्डने केंद्र सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते...

- अमेय गोगटे संपादक, लोकमत डॉट कॉम

फेसबुकवर वाचलेली एखादी माहिती किंवा व्हॉट्सॲपवर आलेला एखादा मेसेज तुम्ही लगेच दोन-चार ग्रुपवर फॉरवर्ड करता... त्यावर तुमचा एक मित्र, “अरे बाबा, हे फेक आहे, उगाच काहीतरी चुकीची माहिती पसरवू नको,” असा रिप्लाय करतो... आणि मग ‘सॉरी’ म्हणून तो मेसेज डीलीट करण्याशिवाय तुमच्याकडे काही पर्याय नसतो... असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडू लागलंय. कारण, सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आणि दुर्दैवाने खोटी, फसवी, चुकीची, अर्धवट माहिती हा सोशल मीडियाचा अविभाज्य भाग होऊ लागलाय. सोशल मीडिया किंवा समाजमाध्यम असं म्हणताना त्यात ‘सोशल’ हा शब्द असला, तरी ही माध्यमं आज ‘पर्सनल स्पेस’ म्हणूनच वापरली जाताहेत. त्यामुळे त्यावरची ‘फेकाफेक’ थांबवण्याचं कामही ‘पर्सनल लेव्हल’वरच होऊ शकतं. 

आता हा विषय चर्चेत यायचं कारण म्हणजे, उच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल. केंद्र सरकारने माहिती-तंत्रज्ञान कायद्यात एक दुरुस्ती केली होती. समाजमाध्यमांवर सरकारच्या कामकाजासंबंधी ज्या बातम्या, मजकूर प्रसिद्ध होतो, तो ‘फॅक्ट चेक युनिट’च्या माध्यमातून फॉल्स/फेक/मिसलीडिंग ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असेल, असं त्यात नमूद केलं होतं. या युनिटने चुकीचा ठरवलेला मजकूर संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एकतर काढून टाकावा लागणार होता किंवा त्याच्या समर्थनार्थ कायदेशीर लढाई लढावी लागणार होती. याविरोधात कन्टेंट क्रिएटर कुणाल कामरा आणि काही संपादक संघटनांनी कोर्टाचं दार ठोठावलं होतं. त्यानंतर, सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून उच्च न्यायालयाने ही दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली आहे. कारण, या अशा तरतुदीमुळे राज्यघटनेने दिलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता आणि व्यवसाय करण्याच्या अधिकारांचं उल्लंघन होतंय, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. म्हणजेच, सरकारच्या निर्णयातील, योजनेतील त्रुटी दाखविण्याचा, सरकारच्या चुका दाखविण्याचा, त्याबाबत मत मांडण्याचा अधिकार नागरिकांना आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.

आता या निकालामुळे, सरकारविरोधात खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांना मोकळं रानच मिळालं, असं वरकरणी वाटू शकतं. मात्र, तसं होणार नाही. कारण, आयटी ॲक्टमध्ये एक अशी तरतूद आहे, जी खोट्या बातम्या रोखण्यासाठीच केलेली आहे. एखादा खोटा, चुकीचा मजकूर सोशल मीडियावर दिसल्यास आपण कोर्टाच्या माध्यमातून सोशल मीडियाला ती पोस्ट काढायला सांगू शकतो. केंद्र सरकारही या मार्गाने जाऊन आपल्याविरोधातील खोट्या बातम्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून घेऊच शकतं. मग, ही दुरुस्ती कशासाठी होती? ‘फॅक्ट चेक युनिट’ स्थापन करून आपल्याबद्दलच्या बातम्या स्वतःच खऱ्या-खोट्या ठरवणं म्हणजे ‘उंदराला मांजर साक्ष’ असं होण्याची शक्यता होती. ती लक्षात घेऊनच उच्च न्यायालयाने ही दुरुस्ती रद्द ठरवली आहे. 

यानिमित्ताने, सोशल मीडियावरील एखादी पोस्ट, माहिती, बातमी संशयास्पद वाटल्यास आपण ती ‘रिपोर्ट’ करू शकतो. त्यानंतर, संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला त्या मजकुराची योग्य तपासणी करावी लागते. ‘इंटरनॅशनल फॅक्ट चेक नेटवर्क’ने प्रमाणित केलेले फॅक्ट चेकर्स पोस्टची सत्यासत्यता पडताळून पाहतात. ती माहिती खोटी असल्यास त्यावर तसं ‘लेबल’ लावलं जातं. लहान मुलांचं शोषण, नग्नता यासारख्या ‘कम्युनिटी स्टॅण्डर्ड’चं उल्लंघन करणाऱ्या पोस्ट फेसबुक, इन्स्टाग्रामवरून डीलीट केल्या जाऊ शकतात. यात सजग नेटकरी म्हणून आपलीही भूमिका महत्त्वाची आहे. सोशल मीडियाची वॉल ही आपलीच आहे, त्यावर मत मांडण्याचा अधिकारही आपल्याला आहे; मग, अधिकारासोबत कर्तव्यही बजावूया की! कुठलीही माहिती शेअर किंवा फॉरवर्ड करण्याआधी, माहितीचा/बातमीचा सोर्स काय, याचं उत्तर मिळतंय का पाहा. 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज