शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पहिल्या पेपरला ९६,१८१ परीक्षार्थी

By admin | Updated: February 28, 2017 03:20 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे.

ठाणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी ठाणे जिल्ह्यातील ९६ हजार १८१ परीक्षार्थी असून १४८ केंद्रांवर त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणासह प्राथमिक विभाग आणि निरंतर शिक्षण विभाग आदी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. केंद्रात व परिसरातील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवलेला आहे. चोख पोलीस बंदोबस्त प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात केला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या प्रत्येक शाखेला इंग्रजी विषय सक्तीचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९६ हजार १८१ परीक्षार्थी या पहिल्या पेपरला बसले आहेत.यासाठी जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू केला असून तो २ एप्रिलपर्यंत अमलात राहणार आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनावश्यक लोकांची गर्दी होऊ दिली जाणार नाही. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ आदी ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. परिसरात वापरण्यात येणारे मोबाइल फोन, डिजिटल डायरी, पेजर, लॅपटॉप, आयपॉड, मायक्र ोफोन इत्यादी साधनांच्या वापरामुळेही गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. यास आळा घालण्यासाठी आणि केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने हा आदेश ठाणे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे, मुख्य व उपकेंद्रांच्या सभोवतालच्या परिसरात लागू केला आहे. (प्रतिनिधी)