शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पहिल्या पेपरला ९६,१८१ परीक्षार्थी

By admin | Updated: February 28, 2017 03:20 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे.

ठाणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी ठाणे जिल्ह्यातील ९६ हजार १८१ परीक्षार्थी असून १४८ केंद्रांवर त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणासह प्राथमिक विभाग आणि निरंतर शिक्षण विभाग आदी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. केंद्रात व परिसरातील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवलेला आहे. चोख पोलीस बंदोबस्त प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात केला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या प्रत्येक शाखेला इंग्रजी विषय सक्तीचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९६ हजार १८१ परीक्षार्थी या पहिल्या पेपरला बसले आहेत.यासाठी जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू केला असून तो २ एप्रिलपर्यंत अमलात राहणार आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनावश्यक लोकांची गर्दी होऊ दिली जाणार नाही. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ आदी ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. परिसरात वापरण्यात येणारे मोबाइल फोन, डिजिटल डायरी, पेजर, लॅपटॉप, आयपॉड, मायक्र ोफोन इत्यादी साधनांच्या वापरामुळेही गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. यास आळा घालण्यासाठी आणि केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने हा आदेश ठाणे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे, मुख्य व उपकेंद्रांच्या सभोवतालच्या परिसरात लागू केला आहे. (प्रतिनिधी)