शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

तीन महिन्यांत राज्यभरात स्वाइन फ्लूचे ९४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:46 IST

प्रादुर्भाव वाढता : रुग्णांची संख्या पोहोचली बाराशेच्या वर, नाशिकमध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल ९४ बळी गेले आहेत. तर राज्यात १० एप्रिलपर्यंत १ हजार २३६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. याखेरीज, राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले असून त्याची संख्या २१ आहे. तर आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून रुग्णालयात आॅसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण १४ हजार १३३ एवढे आहेत.

राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये आणि अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्यूची संख्या अधिक आहे. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. हा विषाणू श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. यातून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात.

स्वाइनचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात असून प्रतिबंध व नियंत्रणास सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.जिल्हा/मनपा मृत्यूनाशिक २१नागपूर १६अहमदनगर १२पुणे मनपा ८कोल्हापूर ५पुणे ग्रामीण, अमरावती प्रत्येकी ४मुंबई मनपा, जळगाव प्रत्येकी ३औरंगाबाद, सातारा, कल्याणपिंपरी, चिंचवड मनपा प्रत्येकी २सिंधुदुर्ग, भंडारा, सोलापूर,वसई-विरार, पालघर, बीड, धुळेचंद्रपूर मनपा, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी १