शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तीन महिन्यांत राज्यभरात स्वाइन फ्लूचे ९४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:46 IST

प्रादुर्भाव वाढता : रुग्णांची संख्या पोहोचली बाराशेच्या वर, नाशिकमध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल ९४ बळी गेले आहेत. तर राज्यात १० एप्रिलपर्यंत १ हजार २३६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. याखेरीज, राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले असून त्याची संख्या २१ आहे. तर आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून रुग्णालयात आॅसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण १४ हजार १३३ एवढे आहेत.

राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये आणि अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्यूची संख्या अधिक आहे. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. हा विषाणू श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. यातून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात.

स्वाइनचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात असून प्रतिबंध व नियंत्रणास सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.जिल्हा/मनपा मृत्यूनाशिक २१नागपूर १६अहमदनगर १२पुणे मनपा ८कोल्हापूर ५पुणे ग्रामीण, अमरावती प्रत्येकी ४मुंबई मनपा, जळगाव प्रत्येकी ३औरंगाबाद, सातारा, कल्याणपिंपरी, चिंचवड मनपा प्रत्येकी २सिंधुदुर्ग, भंडारा, सोलापूर,वसई-विरार, पालघर, बीड, धुळेचंद्रपूर मनपा, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी १