शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

तीन महिन्यांत राज्यभरात स्वाइन फ्लूचे ९४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:46 IST

प्रादुर्भाव वाढता : रुग्णांची संख्या पोहोचली बाराशेच्या वर, नाशिकमध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल ९४ बळी गेले आहेत. तर राज्यात १० एप्रिलपर्यंत १ हजार २३६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. याखेरीज, राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले असून त्याची संख्या २१ आहे. तर आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून रुग्णालयात आॅसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण १४ हजार १३३ एवढे आहेत.

राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये आणि अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्यूची संख्या अधिक आहे. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. हा विषाणू श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. यातून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात.

स्वाइनचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात असून प्रतिबंध व नियंत्रणास सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.जिल्हा/मनपा मृत्यूनाशिक २१नागपूर १६अहमदनगर १२पुणे मनपा ८कोल्हापूर ५पुणे ग्रामीण, अमरावती प्रत्येकी ४मुंबई मनपा, जळगाव प्रत्येकी ३औरंगाबाद, सातारा, कल्याणपिंपरी, चिंचवड मनपा प्रत्येकी २सिंधुदुर्ग, भंडारा, सोलापूर,वसई-विरार, पालघर, बीड, धुळेचंद्रपूर मनपा, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी १