शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद अखेर बडोद्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 23:27 IST

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे.

मुंबई, दि. 18 - 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. बडोद्याला चौथ्यांदा साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळाला असून, तब्बल 83 वर्षांनंतर प्रथमच बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलडाणा जिह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते. मात्र शुकदास महाराजांवर अनिंसने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे. डोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. यापूर्वी 1909 यावर्षी सातवे संमेलन, 1921 या वर्षी अकरावे संमेलन व 1934 या वर्षी विसावे संमेलन या ठिकाणी घेण्यात आली होती. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न.चिं.केळकर, ना.गो. चापेकर हे बडोद्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झालेले नाही. आता हिवरा आश्रमाने माघार घेतल्याने तब्बल 83 वर्षांनंतर बडोद्याला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.   हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. त्यामुळे अनेकांची नाराजी झाली आहे. या बदनामीमुळे ९१ वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गेल्या आठवड्यात गुरूवारी स्पष्ट केले होते. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Gujaratगुजरात