शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद अखेर बडोद्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 23:27 IST

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे.

मुंबई, दि. 18 - 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. बडोद्याला चौथ्यांदा साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळाला असून, तब्बल 83 वर्षांनंतर प्रथमच बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलडाणा जिह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते. मात्र शुकदास महाराजांवर अनिंसने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे. डोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. यापूर्वी 1909 यावर्षी सातवे संमेलन, 1921 या वर्षी अकरावे संमेलन व 1934 या वर्षी विसावे संमेलन या ठिकाणी घेण्यात आली होती. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न.चिं.केळकर, ना.गो. चापेकर हे बडोद्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झालेले नाही. आता हिवरा आश्रमाने माघार घेतल्याने तब्बल 83 वर्षांनंतर बडोद्याला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.   हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. त्यामुळे अनेकांची नाराजी झाली आहे. या बदनामीमुळे ९१ वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गेल्या आठवड्यात गुरूवारी स्पष्ट केले होते. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Gujaratगुजरात