शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

बलुतेदार संस्थांना ९८ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: February 14, 2016 00:25 IST

खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.

यवतमाळ : खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात सर्वच जिल्ह्यात तालुकास्तरावर बलुतेदार संस्था कार्यरत आहेत. कारागीर हमी योजनेंतर्गत त्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात आले होते. मात्र व्यवसाय डबघाईस आल्याने त्यांचे हे कर्ज प्रलंबित राहिले. ३११ बलुतेदार संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत झालेल्या कर्ज व व्याजाला माफी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर ३१ मार्च २००८ अखेरपर्यंतच्या कर्ज व व्याज अशा ९८ कोटी ५९ लाखांच्या रकमेला माफी देण्यात आली. त्यामध्ये ५१ कोटी ७४ लाख मुद्दल व ४६ कोटी ८४ लाखाच्या व्याजाचा समावेश आहे. राज्यातील बलुतेदार संस्थांच्या ८३ हजार ९८१ सभासदांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने ८ फेब्रुवारी २०१६ रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणीकर्जाचे संपूर्ण व्याज माफ न झाल्याने बलुतेदार सभासदांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. २००८नंतर बहुतांश कर्जवाटप झाले नसले तरी त्यावरील व्याज मात्र आजही सुरू आहे. २००८नंतरचे व्याजही शासनाने माफ करून सातबारा कोरा करावा, अशी बलुतेदार तथा ग्रामीण कारागीर संस्थांची मागणी आहे. (प्रतिनिधी)