शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

अकरावीसाठी ८८ हजार जागा

By admin | Updated: August 6, 2016 01:23 IST

अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली

मुंबई : अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या किमान ८८ हजार जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना केले होते. त्यानंतर ८ व ९ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरायचे आहेत. शिवाय अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालये निवडणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. याआधीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेप्रमाणे विशेष फेरीत महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांची नावे देण्याची संधी मिळणार आहे. सहाव्या गुणवत्ता यादीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकूण ९७ हजार ६०९ जागा रिक्त होत्या. त्यात कला शाखेच्या १८,५३६ वाणिज्यच्या ५३,५१५ आणि विज्ञान शाखेच्या २५,५५८ रिक्त जागांचा समावेश होता. मात्र सहाव्या गुणवत्ता यादीत एकूण ९, ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांतील ९,६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८७,९६४ जागा रिक्त राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवाय १०० टक्के विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने रिक्त जागांचा आकडा ९० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवाचदूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखाबदल करायचा आहे, विषयबदल करायचा आहे, असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीसाठी अर्ज करू शकतात.विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे.शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करण्यास सुरुवात झाली आहे.नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.विशेष फेरीसाठी किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची निवड करणे बंधनकारक आहे.महाविद्यालयांची निवड करताना संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा आणि कट आॅफ पाहूनच निवड करावी.कोणत्याही क्षेत्र किंवा वॉर्डमधील महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.याआधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून घेतलेला प्रवेश विशेष फेरीसाठी अर्ज करताना रद्द करण्याची गरज नाही.>उपलब्ध जागांची संख्या शाखारिक्त जागाकला१८ हजार ५३६वाणिज्य५३ हजार ५१५विज्ञान२५ हजार ५५८एकूण९७ हजार ६०९

 

अर्धवट अर्ज भरल्याने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार आहे.मात्र या विद्यार्थ्यांना शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि महानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.