शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

अकरावीसाठी ८८ हजार जागा

By admin | Updated: August 6, 2016 01:23 IST

अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली

मुंबई : अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या किमान ८८ हजार जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना केले होते. त्यानंतर ८ व ९ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरायचे आहेत. शिवाय अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालये निवडणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. याआधीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेप्रमाणे विशेष फेरीत महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांची नावे देण्याची संधी मिळणार आहे. सहाव्या गुणवत्ता यादीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकूण ९७ हजार ६०९ जागा रिक्त होत्या. त्यात कला शाखेच्या १८,५३६ वाणिज्यच्या ५३,५१५ आणि विज्ञान शाखेच्या २५,५५८ रिक्त जागांचा समावेश होता. मात्र सहाव्या गुणवत्ता यादीत एकूण ९, ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांतील ९,६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८७,९६४ जागा रिक्त राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवाय १०० टक्के विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने रिक्त जागांचा आकडा ९० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवाचदूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखाबदल करायचा आहे, विषयबदल करायचा आहे, असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीसाठी अर्ज करू शकतात.विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे.शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करण्यास सुरुवात झाली आहे.नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.विशेष फेरीसाठी किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची निवड करणे बंधनकारक आहे.महाविद्यालयांची निवड करताना संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा आणि कट आॅफ पाहूनच निवड करावी.कोणत्याही क्षेत्र किंवा वॉर्डमधील महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.याआधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून घेतलेला प्रवेश विशेष फेरीसाठी अर्ज करताना रद्द करण्याची गरज नाही.>उपलब्ध जागांची संख्या शाखारिक्त जागाकला१८ हजार ५३६वाणिज्य५३ हजार ५१५विज्ञान२५ हजार ५५८एकूण९७ हजार ६०९

 

अर्धवट अर्ज भरल्याने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार आहे.मात्र या विद्यार्थ्यांना शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि महानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.