शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ८६५ लाचखोर गजाआड

By admin | Updated: July 2, 2015 03:45 IST

लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली.

मुंबई : लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली. अटक आरोपींमध्ये महसूल विभाग आणि गृहविभागातील अधिकारी सर्वाधिक आहेत, तर शासकीय आस्थापनांमधील तिसऱ्या श्रेणीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी सर्वात लाचखोर आहेत, हे स्पष्ट झाले.गेल्या वर्षी एसीबीने संपूर्ण राज्यात १२४५ कारवाया केल्या होत्या. जानेवारी ते जूनपर्यंत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ३७ जणांवर गुन्हा सिद्ध झाला होता. या वर्षी एसीबीने राज्यात ६१२ सापळे रचले. यामध्ये एकून ८६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४६ सापळे जास्त आहेत. यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल ६१ खटल्यांमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. अद्यापही राज्याच्या विविध न्यायालयांमध्ये ३५८७ खटले सुरू आहेत.या आरोपींकडून १ कोटी ४२ लाख २७ हजार ४६३ इतकी मालमत्ता हस्तगत केली आहे, तर बेहिशोबी मालमत्तेपकरणी ९ कोटी ७६ लाख ५१ हजार ३९५ इतकी रक्कम हस्तगत केली आहे. लाच घेताना अटक झालेल्यांमध्ये ग्रामविकास विभाग १११, नगर विकास विभाग ४२, म.रा.वि.वि.क. मर्या ३५, आरोग्य विभाग २३, शिक्षण विभाग ३०, वन विभाग २२, सहकार आणि पणन विभाग ११ आणि पाटबंधारे विभाग ७ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोपी : १५५ पोलीस, ८२ तलाठी, ३० इंजिनिअर, २२ शिक्षक, ११ डॉक्टर, ४ वकील, ५ सरपंच, २ नगरसेवक/महापौर असे लोकसेवक, तर कारवाई झालेल्या खासगी व्यक्तींची संख्या १३३ आहे. लाचखोर लोकसेवकांमध्ये ५० महिलांचा सहभाग आहे.