शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

राज्यातील विद्यार्थ्यांना ८५% जागा

By admin | Updated: September 20, 2016 04:55 IST

राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के जागा केवळ राज्यातील विद्यार्थ्यांमधूनच भरण्यासंदर्भात राज्य सरकारने कायदा केला आहे. राज्यातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि अधिवासाचे प्रमाणपत्र असणाऱ्याच विद्यार्थ्यांना राज्याच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्रवेशही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या दोन्ही निर्णयांना परराज्यांतील विद्यार्थ्यांनी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व अल्पसंख्याक महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. ‘अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास आम्ही नकार देत आहोत. सरकारच्या या निर्णयामध्ये आम्ही या घडीला हस्तक्षेप करू इच्छित नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.खंडपीठाच्या या निर्णयामुळे यंदाची वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सरकारच्या नव्या धोरणानुसार होईल. खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांना ८५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील, तर १५ टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून देता येतील.राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, हा राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतर्फे अ‍ॅड. पी. थोरात यांनी सरकारचे हे धोरण मनमानी असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना सरकारकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे सरकारचे नियम या महाविद्यालयांना लागू होऊ शकत नाहीत,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. थोरात यांनी केला होता. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार देत या याचिकांवर अंतरिम सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी) >विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.‘राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने परप्रांतीय येथेच स्थायिक होण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना परराज्यात सहज प्रवेश मिळत नाही. त्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे,’ असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अणे यांनी केला.