शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यार्थ्यांना ८५% जागा

By admin | Updated: September 20, 2016 04:55 IST

राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के जागा केवळ राज्यातील विद्यार्थ्यांमधूनच भरण्यासंदर्भात राज्य सरकारने कायदा केला आहे. राज्यातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि अधिवासाचे प्रमाणपत्र असणाऱ्याच विद्यार्थ्यांना राज्याच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्रवेशही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या दोन्ही निर्णयांना परराज्यांतील विद्यार्थ्यांनी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व अल्पसंख्याक महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. ‘अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास आम्ही नकार देत आहोत. सरकारच्या या निर्णयामध्ये आम्ही या घडीला हस्तक्षेप करू इच्छित नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.खंडपीठाच्या या निर्णयामुळे यंदाची वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सरकारच्या नव्या धोरणानुसार होईल. खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांना ८५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील, तर १५ टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून देता येतील.राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, हा राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतर्फे अ‍ॅड. पी. थोरात यांनी सरकारचे हे धोरण मनमानी असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना सरकारकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे सरकारचे नियम या महाविद्यालयांना लागू होऊ शकत नाहीत,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. थोरात यांनी केला होता. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार देत या याचिकांवर अंतरिम सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी) >विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.‘राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने परप्रांतीय येथेच स्थायिक होण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना परराज्यात सहज प्रवेश मिळत नाही. त्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे,’ असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अणे यांनी केला.