शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

नदीतून काढले ८० हजार किलो प्लास्टिक

By admin | Updated: April 3, 2017 02:53 IST

मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला

मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, या उपक्रमांतर्गत रविवारी पोईसर नदीतून तब्बल ८० हजार किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे. रिव्हर मार्च, महापालिका आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून, ही तर सुरुवात असल्याची प्रतिक्रिया रिव्हर मार्चच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.मुंबईमधील चारही नद्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम रिव्हर मार्चने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिकाही त्यांना सहकार्य करत आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे स्वत: रिव्हर मार्चचे नेतृत्व करत असून, त्यांनीही यापूर्वी नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत अशा स्वरूपात नदीची साफसफाई झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे कंत्राटदार येतात कचरा काढतात. तोच कचरा नदीच्या किनाऱ्याला ठेवला जातो. मग हाच कचरा पावसाळ्यात पुन्हा नदीच्या पात्रात जमा होतो. दरम्यान, दर रविवारी नदी सफाई केली जाणार असून, मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नदीच्या तळाला ६ फुटांच्या अंतरापर्यंत कचऱ्याचा थर जमा झालेला आहे. एवढा मोठा थर जमा झालेला असताना नदीचे पाणी हे जमिनीमध्ये कसे जिरेल? जेव्हा सगळा कचरा काढला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने नदीचे पाणी जमिनीत मुरेल. मग पुन्हा नदीला जीवदान मिळेल. महापालिकेने यासाठी चार ट्रकची व्यवस्था केली असून, दोन जेसीबीची मदत घेतली जात आहे>नागरिकांना दिलासादिंडोशीच्या मालाड (पूर्व) प्रभाग क्रमांक ३८ येथील आप्पापाड्यातील सावित्रीबाई फुलेनगर ते क्रांतीनगर-गोकूळनगर येथील मुख्य नाल्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेथील नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतत भेडसावणाऱ्या या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या कामासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून २४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नाल्याच्या कामाचा शुभारंभ झाला; त्या वेळी येथे माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेवक आत्माराम चाचे, ग्राहक संरक्षण कक्षाचे विनायक राऊत, सतीश यादव, गणेश घोले उपस्थित होते.