शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

८० प्रवासी विमानातच खोळंबले

By admin | Updated: October 9, 2015 05:20 IST

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

औरंगाबाद : विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी या कंपनीच्या विमानाने तिरुपतीला गेलेल्या ८० प्रवाशांना खराब हवामानाचे कारण देत हैदराबादमध्ये वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत प्रवासी हैदराबाद विमानतळावर विमानातच बसून होते. चिकलठाणा विमानतळावरून गुरुवारी दुपारी ३.३० वाजता टर्बो मेघा एअरवेज कंपनीच्या विमानाने तिरुपतीसाठी ८० प्रवासी रवाना झाले. हे विमान हैदराबादला पोहोचल्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानाने तिरुपतीसाठी उड्डाण घेतले; परंतु काही वेळेनंतर हे विमान पुन्हा हैदराबाद विमानतळावर परत आले. खराब हवामान आणि पावसामुळे विमान परत आणल्याची माहिती यावेळी प्रवाशांना देण्यात आली. विमान हैदराबाद विमानतळावरच उभे करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विमान तिरुपतीकडे रवाना होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आंदोलनाची भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत प्रवासी विमानातच बसलेले होते. ८० प्रवाशांमध्ये जवळपास २२ प्रवासी हे शहरातील आहेत. कंपनीने कोणतीही सुविधा दिली नाही, असे प्रवाशांनी सांगितले.(प्रतिनिधी)कंपनी म्हणते खराब हवामानामुळे...खराब हवामानामुळे विमान तिरुपतीहून हैदराबादला परतआले. प्रवाशांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था क रण्याची आमची तयारी आहे; परंतु प्रवाशांनी त्यास प्रतिसाद दिला नाही, असे टर्बो मेघा एअरवेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश यांनी सांगितले.