शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 10:09 IST

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील असून, भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. वाय.एन. नेने यांच्या मँगो थ्रू मिलेनिया या शोधनिबंधानुसार उपनिषदे, मौर्यन शिलालेखांमध्ये आंब्याचा उल्लेख आढळतो.

मूळ भारतीय आंब्याचे प्रकार हे मुख्यतः चोखून खाण्यास योग्य, रसाळ व अल्पकाळ ताजे राहणारे असे होते. या आंब्यांना आज रायवळ म्हणजेच रानवळ म्हणजे रानातील आंबे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आंब्याची जे वाण स्थानिक स्वरूपात होते ती सगळी अस्सल भारतीय होत. याच वाणांचा संकर करून सगळ्या संकरित प्रजाती बनल्या. म्हणूनच आज कोकणात काही ठिकाणी ४००-५०० वर्षे जुनी आंब्याची झाडे सापडतात.

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या. यातील ज्या जाती स्वादिष्ट आणि टिकाऊ म्हणून मायदेशी भेट म्हणून पाठविण्यास योग्य, टेबल फ्रूट म्हणून खाण्यास योग्य होत्या अशा सर्वच जातींना पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नावे दिली गेली. अल्फोन्सो अल्ब्यूकर्क हा त्यापैकी एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होय. त्याच्या नावाने जगप्रसिद्ध झालेला हापूस आंबा भौगोलिक मानांकन प्राप्त व महाराष्ट्राला जागतिक कीर्ती मिळवून देणारा आहे. हा आंबा मुख्यतः रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात आढळतो, असे या शोधनिबंधात नमूद केले आहे.

राज्यात आढळणाऱ्या आम्रजातीnमानकुराद : रत्नागिरी व सिंधुदुर्गात या प्रकारच्या आंब्याच्या बागा आढळतात. मोसमाच्या मध्यावर हे फळ येते.nमलगोवा : औरंगाबाद, बीड, परभणी इत्यादी जिल्ह्यांत मलगोवा प्रकारातील आंबा मिळतो. मोसमाच्या शेवटी हे बाजारात बघायला मिळते.nकेसर : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत आढळतो. मोसमाच्या सुरुवातीलाच याचे उत्पन्न येते.nवनराज : नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य चांगले असते व तो मोसमाच्या मध्यावर मिळतो.nराजापुरी : हा आंबा औरंगाबाद विभागात मिळतो. वर्षभर याचे पीक येत असते.nपायरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य अतिशय कमी आहे. मोसमाच्या मध्यावर मिळतो.

nसमशीतोष्ण प्रदेशात येणारे आंबा हे फळ महाराष्ट्रात कुठेही पिकते. कोकणात सर्वोत्तम आंब्याच्या जाती आढळतात. यात हापूस, पायरी, मलगोवा, मानकुराद, केसर, राजापुरी, वनराज, तोतापरी या महाराष्ट्रात परंपरागत पिकविल्या जाणाऱ्या आम्रजाती आहेत. तर भारताच्या अन्य राज्यांत जन्माला आलेल्या सोनपरी, आम्रपाली, मल्लिका या आंब्याच्या जाती महाराष्ट्रात आढळतात.

टॅग्स :Mangoआंबा