शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 10:09 IST

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील असून, भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. वाय.एन. नेने यांच्या मँगो थ्रू मिलेनिया या शोधनिबंधानुसार उपनिषदे, मौर्यन शिलालेखांमध्ये आंब्याचा उल्लेख आढळतो.

मूळ भारतीय आंब्याचे प्रकार हे मुख्यतः चोखून खाण्यास योग्य, रसाळ व अल्पकाळ ताजे राहणारे असे होते. या आंब्यांना आज रायवळ म्हणजेच रानवळ म्हणजे रानातील आंबे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आंब्याची जे वाण स्थानिक स्वरूपात होते ती सगळी अस्सल भारतीय होत. याच वाणांचा संकर करून सगळ्या संकरित प्रजाती बनल्या. म्हणूनच आज कोकणात काही ठिकाणी ४००-५०० वर्षे जुनी आंब्याची झाडे सापडतात.

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या. यातील ज्या जाती स्वादिष्ट आणि टिकाऊ म्हणून मायदेशी भेट म्हणून पाठविण्यास योग्य, टेबल फ्रूट म्हणून खाण्यास योग्य होत्या अशा सर्वच जातींना पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नावे दिली गेली. अल्फोन्सो अल्ब्यूकर्क हा त्यापैकी एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होय. त्याच्या नावाने जगप्रसिद्ध झालेला हापूस आंबा भौगोलिक मानांकन प्राप्त व महाराष्ट्राला जागतिक कीर्ती मिळवून देणारा आहे. हा आंबा मुख्यतः रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात आढळतो, असे या शोधनिबंधात नमूद केले आहे.

राज्यात आढळणाऱ्या आम्रजातीnमानकुराद : रत्नागिरी व सिंधुदुर्गात या प्रकारच्या आंब्याच्या बागा आढळतात. मोसमाच्या मध्यावर हे फळ येते.nमलगोवा : औरंगाबाद, बीड, परभणी इत्यादी जिल्ह्यांत मलगोवा प्रकारातील आंबा मिळतो. मोसमाच्या शेवटी हे बाजारात बघायला मिळते.nकेसर : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत आढळतो. मोसमाच्या सुरुवातीलाच याचे उत्पन्न येते.nवनराज : नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य चांगले असते व तो मोसमाच्या मध्यावर मिळतो.nराजापुरी : हा आंबा औरंगाबाद विभागात मिळतो. वर्षभर याचे पीक येत असते.nपायरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य अतिशय कमी आहे. मोसमाच्या मध्यावर मिळतो.

nसमशीतोष्ण प्रदेशात येणारे आंबा हे फळ महाराष्ट्रात कुठेही पिकते. कोकणात सर्वोत्तम आंब्याच्या जाती आढळतात. यात हापूस, पायरी, मलगोवा, मानकुराद, केसर, राजापुरी, वनराज, तोतापरी या महाराष्ट्रात परंपरागत पिकविल्या जाणाऱ्या आम्रजाती आहेत. तर भारताच्या अन्य राज्यांत जन्माला आलेल्या सोनपरी, आम्रपाली, मल्लिका या आंब्याच्या जाती महाराष्ट्रात आढळतात.

टॅग्स :Mangoआंबा