शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 10:09 IST

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील असून, भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. वाय.एन. नेने यांच्या मँगो थ्रू मिलेनिया या शोधनिबंधानुसार उपनिषदे, मौर्यन शिलालेखांमध्ये आंब्याचा उल्लेख आढळतो.

मूळ भारतीय आंब्याचे प्रकार हे मुख्यतः चोखून खाण्यास योग्य, रसाळ व अल्पकाळ ताजे राहणारे असे होते. या आंब्यांना आज रायवळ म्हणजेच रानवळ म्हणजे रानातील आंबे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आंब्याची जे वाण स्थानिक स्वरूपात होते ती सगळी अस्सल भारतीय होत. याच वाणांचा संकर करून सगळ्या संकरित प्रजाती बनल्या. म्हणूनच आज कोकणात काही ठिकाणी ४००-५०० वर्षे जुनी आंब्याची झाडे सापडतात.

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या. यातील ज्या जाती स्वादिष्ट आणि टिकाऊ म्हणून मायदेशी भेट म्हणून पाठविण्यास योग्य, टेबल फ्रूट म्हणून खाण्यास योग्य होत्या अशा सर्वच जातींना पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नावे दिली गेली. अल्फोन्सो अल्ब्यूकर्क हा त्यापैकी एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होय. त्याच्या नावाने जगप्रसिद्ध झालेला हापूस आंबा भौगोलिक मानांकन प्राप्त व महाराष्ट्राला जागतिक कीर्ती मिळवून देणारा आहे. हा आंबा मुख्यतः रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात आढळतो, असे या शोधनिबंधात नमूद केले आहे.

राज्यात आढळणाऱ्या आम्रजातीnमानकुराद : रत्नागिरी व सिंधुदुर्गात या प्रकारच्या आंब्याच्या बागा आढळतात. मोसमाच्या मध्यावर हे फळ येते.nमलगोवा : औरंगाबाद, बीड, परभणी इत्यादी जिल्ह्यांत मलगोवा प्रकारातील आंबा मिळतो. मोसमाच्या शेवटी हे बाजारात बघायला मिळते.nकेसर : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत आढळतो. मोसमाच्या सुरुवातीलाच याचे उत्पन्न येते.nवनराज : नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य चांगले असते व तो मोसमाच्या मध्यावर मिळतो.nराजापुरी : हा आंबा औरंगाबाद विभागात मिळतो. वर्षभर याचे पीक येत असते.nपायरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य अतिशय कमी आहे. मोसमाच्या मध्यावर मिळतो.

nसमशीतोष्ण प्रदेशात येणारे आंबा हे फळ महाराष्ट्रात कुठेही पिकते. कोकणात सर्वोत्तम आंब्याच्या जाती आढळतात. यात हापूस, पायरी, मलगोवा, मानकुराद, केसर, राजापुरी, वनराज, तोतापरी या महाराष्ट्रात परंपरागत पिकविल्या जाणाऱ्या आम्रजाती आहेत. तर भारताच्या अन्य राज्यांत जन्माला आलेल्या सोनपरी, आम्रपाली, मल्लिका या आंब्याच्या जाती महाराष्ट्रात आढळतात.

टॅग्स :Mangoआंबा