शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीत ८ नवे जिल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:19 IST

राज्यातल्या अंगणवाड्यांतील दोन लाखांहून अधिक बालकांची कुपोषणातून मुक्तता करण्यासाठी रिलायन्स न्युट्रिशन

मुंबई : राज्यातल्या अंगणवाड्यांतील दोन लाखांहून अधिक बालकांची कुपोषणातून मुक्तता करण्यासाठी रिलायन्स न्युट्रिशन गार्डन्सच्या माध्यमातून महिला शासनाच्या बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशनने २०१५ साली एक सामंजस्य करार केला होता. राजमाता जिजाऊ मदर-चाइल्ड हेल्थ न्युट्रिशन मिशन (राजमाता जिजाऊ माता-बालक आरोग्य आणि पोषण अभियान) अंतर्गत या कराराचे गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि रिलायन्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांच्या उपस्थितीत नूतनीकरण करण्यात आले.या उपक्रमामुळे केंद्र सरकारने बालकांसाठी २०१६ मध्ये केलेल्या राष्ट्रीय कृती आराखड्यातील शाश्वत विकास उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे. या उद्दिष्टामध्ये आहारातील सुधारणांवर भर देण्यात आला आहे. रिलायन्स फाउंडेशन समूहांना लहान स्वयंपाकघर बांधण्यास किंवा परसात बाग/मळा म्हणजेच रिलायन्स न्युट्रिशन गार्डन (रिलायन्स पोषण मळा) फुलवण्यास साहाय्य करत आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करण्यात आलेले, अत्यल्प खर्च असलेले, सेंद्रिय मळे आहेत. यात देशभरातील शेतकरी कुटुंबांचा आरोग्य आणि पोषणस्तर वाढवण्याची क्षमता असलेल्या फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेऊ शकेल, अशी बहुस्तरीय पीक पद्धती स्वीकारण्यात आली आहे.या भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद, वर्धा या आठ जिल्ह्यांत रिलायन्स न्युट्रिशन गार्डन्स स्थापन करण्यात आली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अंगणवाड्यांच्या आवारात विकसित करण्यात आलेल्या ७ हजार ३०० न्युट्रिशन गार्डन्सच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक बालकांना ताजी फळे आणि भाज्यांचा पुरवठा करण्यात आला. हे मळे फुलवण्यासाठी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत सातत्य राखण्यासाठी साहाय्य करण्याच्या दृष्टीने रिलायन्सने ४५० तज्ज्ञ प्रशिक्षकही नेमले आहेत.