शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

८ लाख २० हजार मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून २०१५-१६ या शैक्षणिक

- यदु जोशी,  मुंबई

अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील ८ लाख २० हजार म्हणजे ४९ टक्के विद्यार्थी वंचित राहिले आहेत.या वर्षात १६ लाख ७४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ८ लाख ५४ हजार ३९२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ८ लाख २० हजार ३७३ विद्यार्थ्यांना मिळाली नाही. निधीची कमतरता आणि विभागाच्या अधिकाऱ्यांमधील नियोजनाचा अभाव अशी दोन्ही कारणे त्यासाठी सांगितली जात आहेत. आधीच्या वर्षांतील प्रलंबित शिष्यवृत्तीपोटी ६ लाख ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांना ९४२ कोटी रुपये वाटण्यात आले. विविध महसूल विभागांचा विचार केला तर सर्वाधिक ७१ टक्के वाटप लातूर विभागाने तर सर्वांत कमी ४० टक्के वाटप हे नागपूर विभागाने केले. अमरावती - ५८ टक्के, औरंगाबाद - ५२ टक्के, मुंबई - ५८ टक्के, नाशिक - ६० टक्के आणि पुणे - ४३ टक्के असे अन्य प्रमाण आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ई-स्कॉलरशिप वेबसाईटवरून शनिवारी ही आकडेवारी उपलब्ध झाली.या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी मात्र इतकी प्रकरणे प्रलंबित असल्याचा इन्कार केला. सुमारे साडेतीन ते चार लाख प्रकरणे प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. विशेषत: ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी केंद्र सरकारकडून मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील टक्केवारी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात 2015-16या शैक्षणिक वर्षातील १ लाख ५८ हजार १९२ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५१ हजार ७१७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. केवळ ३२ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ झाला.दुष्काळग्रस्त बीडमध्ये वाटप ५१ टक्केच : बीड या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्क्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ झाला. हिंगोली व लातूरमध्ये वाटपाची टक्केवारी ७० आणि ७१ अशी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे ८० टक्के वाटप झाले.बडोलेंच्या जिल्ह्यातून शिष्यवृत्तीचा पैसा परतसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे ज्या जिल्ह्यातून निवडून येतात आणि जिथे पालकमंंत्री आहेत तेथील ४९ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली. चालू वर्षी ३५ हजार ६८० विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ६७३ विद्यार्थ्यांच्या पदरी शिष्यवृत्ती पडली; तर ३ कोटी ८७ लाख रुपये परत गेले. ३० टक्के कपातीचा सामाजिक अन्यायसामाजिक न्याय विभागासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या तरतुदीला ३० टक्के कट लावण्यात आल्याची माहिती आहे. हा अन्याय असल्याचा नाराजीचा सूर आहे.शिष्यवृत्ती वाटपावर सामाजिक न्याय विभागाने २ हजार ५९० कोटी रुपये खर्च केले. त्यात आधीच्या वर्षांतील ६ लाख ३ हजार २२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यावर खर्च झालेल्या ९४८ कोटी रुपयांचा समावेश आहे. गेली काही वर्षे नियमित वाटप झाले असते तर आजची वेळ आली नसती. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री