शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दीड महिन्यात ‘स्वाईन’चे ७९ बळी

By admin | Updated: February 19, 2015 01:48 IST

राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते,

मुंबई : राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.२७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ९० हजार ८८६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.पुण्यात तरूणाचा मृत्यूपुण्यात बुधवारी स्वाइन फ्लूच्या आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे. बुधवारी ८ नवे रुग्ण सापडले असून रुग्णालयात दाखल असलेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.लातूरमध्ये एक बळीशासकीय सर्वोपचार रुग्णालयात संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२, रा. गणेशनगर, अहमदपूर) या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. यापूर्वी अहमदपुरातीलच एका महिलेचा स्वाईन फ्यूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला आहे़नाशिकमध्ये प्रशासन सक्रियजिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आहे. आजाराचे गांभीर्य जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने सर्व तहसीलदारांना सूचना देऊन तालुका पातळीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा व उपाययोजना करण्याचे आदेश दिले, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली.‘सिरम’ बनविणार स्वाइन फ्लूवरील ३ लाख लस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्वाइन फ्लूने पुन्हा थैमान माजवण्यास सुरूवात केल्याने त्याला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील सिरम इन्टिट्यूट आॅफ इंडियाने ही लस बनविण्यास सुरूवात केली असून ३ लाख डोस बनविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.स्वाइन फ्लूवर लस प्रभावी ठरत असल्याने त्याची मागणी सर्वाधिक आहे. २००९ मध्ये महाराष्ट्रासह देशात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने त्यावरील लस तयार केली होती आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले होते. मात्र गेल्या ३ वर्षांत त्याची मागणी घटल्याने उत्पादन केलेल्या १ लाख ८४ हजार लसींची एक्स्पायरी डेट झाल्याने त्या सिरमने नष्ट केल्या होत्या. आता पुन्हा मागणी वाढल्याने त्याचे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. जाधव म्हणाले, पहिल्या बॅचमधील लसीचे उत्पादन पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळेत आता त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते बाजारात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्शासकीय सर्वोपचार रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’ संशयित म्हणून उपचार घेत असलेल्या आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला़ आता सर्वोपचार रुग्णालयात एकूण ८ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे.च्निलंगा तालुक्याच्या मालेगाव येथील मीना बालाजी इनकर (४०) यांना १६ फेब्रुवारी रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी अहमदपूर येथील गणेश नगरातील संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’कडून दोघींचाही वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़