शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:35 IST

शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

मुंबई - आज ज्यांना नियुक्त करतोय त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही शासकीय नोकरीत आला. ती नोकरी नसून सेवा आहे. तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातील जनतेला सेवा देताय. आपल्या सेवेचा भाव कधी कमी होणार नाही ही अपेक्षा आहे. सामान्य माणसाला तेवढेच महत्त्व मिळेल जेवढे एखाद्या महत्त्वाच्या श्रीमंत माणसाला मिळेल. सरकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात शंका राहणार नाही असं काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला. 

मुंबईत महासंकल्प रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, एका वर्षात ७५ हजार रोजगार देत आहोत. पुढील काळात अन्य भरती करणार आहे. शासकीय नोकर भरतीत कुठल्याही चूका होऊ नये अशी काळजी घेतली जाईल. नोकरी भरतीविरोधात कोर्टात कुणी गेले तर पुढच्या सर्व भरती रखडल्या जातात. लवकरच महारोजगार मेळावा भरवून १ लाख नोकर भरती केली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आपल्या राज्यात पहिले कौशल्य विद्यापीठ उभे राहिले आहे. स्टार्टअपबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देण्यावर तरुणांचा भर आहे. देशातील ८० हजार स्टार्टअपपैकी १५ हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. हे स्टार्टअप मोठे होऊन हजारो कोटींचे उभे होतात. देशातील १०० यूनिकॉनमध्ये २५ यूनिकॉन्स महाराष्ट्रात आहे. तरुणाईला स्टार्टअप केल्यानंतर त्याला सातत्याने मदत करणं ही भूमिका राज्याची आहे. स्वयंरोजगारासाठी राज्य शासन विविध योजनातून मदत करते. शासकीय कर्मचारी म्हणून भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पारदर्शकपणे काम करावं. तुम्ही खूप पुढे जा, प्रगती करा. कामामुळे बढती मिळायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नकारात्मक वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्नराज्याच्या दृष्टीने हा आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार असे मेसेज सातत्याने यायचे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, अमृत महोत्सव साजरा केला जातोय. आमचं सरकार आल्यानंतर ७५ हजार नोकऱ्या देऊ असं घोषित केले होते. पुढील भरती टप्प्याटप्प्याने करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. विविध प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळतोय. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम राज्य सरकार करतंय. वेळेत नोकरी मिळायली पाहिजे ही भावना तरुणांची योग्य आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार जणांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. प्रत्येक विभागानुसार जी रिक्त पदे आहेत ती भरण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीला वेग आला पाहिजे. वेळेत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेले अडीच वर्ष केवळ घोषणा होत होत्या. सरकार बदललं, वातावरण बदललं, सगळीकडे उत्साह, चैतन्य आले. सण, उत्सव साजरे झाले पाहिजेत. नकारात्मक वातावरण होतं त्यात सकारात्मकता आणण्याचं काम आम्ही करतोय. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे