शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:35 IST

शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

मुंबई - आज ज्यांना नियुक्त करतोय त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही शासकीय नोकरीत आला. ती नोकरी नसून सेवा आहे. तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातील जनतेला सेवा देताय. आपल्या सेवेचा भाव कधी कमी होणार नाही ही अपेक्षा आहे. सामान्य माणसाला तेवढेच महत्त्व मिळेल जेवढे एखाद्या महत्त्वाच्या श्रीमंत माणसाला मिळेल. सरकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात शंका राहणार नाही असं काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला. 

मुंबईत महासंकल्प रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, एका वर्षात ७५ हजार रोजगार देत आहोत. पुढील काळात अन्य भरती करणार आहे. शासकीय नोकर भरतीत कुठल्याही चूका होऊ नये अशी काळजी घेतली जाईल. नोकरी भरतीविरोधात कोर्टात कुणी गेले तर पुढच्या सर्व भरती रखडल्या जातात. लवकरच महारोजगार मेळावा भरवून १ लाख नोकर भरती केली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आपल्या राज्यात पहिले कौशल्य विद्यापीठ उभे राहिले आहे. स्टार्टअपबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देण्यावर तरुणांचा भर आहे. देशातील ८० हजार स्टार्टअपपैकी १५ हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. हे स्टार्टअप मोठे होऊन हजारो कोटींचे उभे होतात. देशातील १०० यूनिकॉनमध्ये २५ यूनिकॉन्स महाराष्ट्रात आहे. तरुणाईला स्टार्टअप केल्यानंतर त्याला सातत्याने मदत करणं ही भूमिका राज्याची आहे. स्वयंरोजगारासाठी राज्य शासन विविध योजनातून मदत करते. शासकीय कर्मचारी म्हणून भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पारदर्शकपणे काम करावं. तुम्ही खूप पुढे जा, प्रगती करा. कामामुळे बढती मिळायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नकारात्मक वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्नराज्याच्या दृष्टीने हा आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार असे मेसेज सातत्याने यायचे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, अमृत महोत्सव साजरा केला जातोय. आमचं सरकार आल्यानंतर ७५ हजार नोकऱ्या देऊ असं घोषित केले होते. पुढील भरती टप्प्याटप्प्याने करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. विविध प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळतोय. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम राज्य सरकार करतंय. वेळेत नोकरी मिळायली पाहिजे ही भावना तरुणांची योग्य आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार जणांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. प्रत्येक विभागानुसार जी रिक्त पदे आहेत ती भरण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीला वेग आला पाहिजे. वेळेत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेले अडीच वर्ष केवळ घोषणा होत होत्या. सरकार बदललं, वातावरण बदललं, सगळीकडे उत्साह, चैतन्य आले. सण, उत्सव साजरे झाले पाहिजेत. नकारात्मक वातावरण होतं त्यात सकारात्मकता आणण्याचं काम आम्ही करतोय. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे