शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:35 IST

शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

मुंबई - आज ज्यांना नियुक्त करतोय त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही शासकीय नोकरीत आला. ती नोकरी नसून सेवा आहे. तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातील जनतेला सेवा देताय. आपल्या सेवेचा भाव कधी कमी होणार नाही ही अपेक्षा आहे. सामान्य माणसाला तेवढेच महत्त्व मिळेल जेवढे एखाद्या महत्त्वाच्या श्रीमंत माणसाला मिळेल. सरकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात शंका राहणार नाही असं काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला. 

मुंबईत महासंकल्प रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, एका वर्षात ७५ हजार रोजगार देत आहोत. पुढील काळात अन्य भरती करणार आहे. शासकीय नोकर भरतीत कुठल्याही चूका होऊ नये अशी काळजी घेतली जाईल. नोकरी भरतीविरोधात कोर्टात कुणी गेले तर पुढच्या सर्व भरती रखडल्या जातात. लवकरच महारोजगार मेळावा भरवून १ लाख नोकर भरती केली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आपल्या राज्यात पहिले कौशल्य विद्यापीठ उभे राहिले आहे. स्टार्टअपबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देण्यावर तरुणांचा भर आहे. देशातील ८० हजार स्टार्टअपपैकी १५ हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. हे स्टार्टअप मोठे होऊन हजारो कोटींचे उभे होतात. देशातील १०० यूनिकॉनमध्ये २५ यूनिकॉन्स महाराष्ट्रात आहे. तरुणाईला स्टार्टअप केल्यानंतर त्याला सातत्याने मदत करणं ही भूमिका राज्याची आहे. स्वयंरोजगारासाठी राज्य शासन विविध योजनातून मदत करते. शासकीय कर्मचारी म्हणून भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पारदर्शकपणे काम करावं. तुम्ही खूप पुढे जा, प्रगती करा. कामामुळे बढती मिळायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नकारात्मक वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्नराज्याच्या दृष्टीने हा आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार असे मेसेज सातत्याने यायचे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, अमृत महोत्सव साजरा केला जातोय. आमचं सरकार आल्यानंतर ७५ हजार नोकऱ्या देऊ असं घोषित केले होते. पुढील भरती टप्प्याटप्प्याने करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. विविध प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळतोय. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम राज्य सरकार करतंय. वेळेत नोकरी मिळायली पाहिजे ही भावना तरुणांची योग्य आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार जणांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. प्रत्येक विभागानुसार जी रिक्त पदे आहेत ती भरण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीला वेग आला पाहिजे. वेळेत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेले अडीच वर्ष केवळ घोषणा होत होत्या. सरकार बदललं, वातावरण बदललं, सगळीकडे उत्साह, चैतन्य आले. सण, उत्सव साजरे झाले पाहिजेत. नकारात्मक वातावरण होतं त्यात सकारात्मकता आणण्याचं काम आम्ही करतोय. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे