शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

औरंगाबाद पोलिसांसाठी ७४० घरांचा प्रकल्प

By admin | Updated: April 10, 2017 20:12 IST

जुन्या पोलीस वसाहतीत ५४० घरांच्या बांधकामाचे उदघाटन महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 10 - शहर पोलिसांकडून घरांची सतत मागणी होत आहे, मात्र उपलब्ध घरे कमी पडत असल्याने आयुक्तालयातील जुन्या पोलीस वसाहतीत ५४० घरांच्या बांधकामाचे उदघाटन महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासानुसार क्रांतीचौकात आणखी ७४० घरे बांधण्यास गृहविभागाने मान्यता दिल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यासाठी २४० कोटी रुपये खर्चालाही शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.शहर पोलीस दलाचे संख्याबळ साडेतीन हजाराहून अधिक आहे. शिवाय आगामी काळात हे संख्याबळ वाढणारच आहे. येथे रुजू होणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने हवी असतात. यामुळे प्रत्येक जण घरांसाठी अर्ज करीत असतो. परंतु उपलब्ध घरे अत्यल्प आहेत. शिवाय जुन्या घरांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. यामुळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी घरे भाड्याने घेऊन राहावे लागते. पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम पोलीस आयुक्तालयामागील जुन्या पोलीस वसाहतीमधील घरे पाडून तेथे ५४० निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. ही घरे तयार झाल्यानंतरही घरे कमी पडणार असल्याचे पाहून क्रांतीचौक ठाण्यामागील जुन्या पोलीस कॉलनीतील जीर्ण घरे पाडून तेथे ७४० निवासस्थानांची नवीन वसाहत उभारण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. २४० कोटी रुपयांच्या या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळाल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, क्रांतीचौक पोलीस ठाण्याची इमारत पाडण्यात येणार आहे. क्रांतीचौक ठाणे निरालाबाजार रोडवर असावे, असा विचार काही अधिकाऱ्यांकडून पुढे आला आहे. यामुळे नवीन ठाण्याची इमारत निरालाबाजार रोडवर अथवा आहे त्याच ठिकाणी बांधावी, याबाबत निर्णय व्हायचा आहे. शिवाय सिडको पोलीस कॉलनीत २५० घरेही शहर पोलिसांसाठी आहेत. तीन महिन्यात होईल निविदा प्रक्रिया पूर्णक्रांतीचौक पोलीस वसाहतीत नव्याने उभारल्या जाणाऱ्या निवासस्थानाच्या इमारतीचे स्वरुप हे तळमजला आणि त्यावर १५ मजले असे असेल. शिवाय लिफ्टची सुविधाही असेल. या वसाहतीच्या बांधकामाचा आरखडा तयार करण्यात आला असून नाशिक येथील एका कंत्राटदाराने हे काम करण्याची तयारी दर्शविली. पोलीस वसाहतीच्या कामासंदर्भात निविदा प्रक्रियेचे काम तीन महिन्यात पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल.