शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

७२ तृतीयपंथी बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 21:00 IST

तीन वर्षांत वाढले २२ मतदार सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ‘इतर मतदार’

धनंजय वाखारे /आॅनलाइन लोकमत नाशिक :  सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ‘इतर मतदार’ म्हणून स्वत:ची ओळख जपण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर आता येत्या २१ फेबु्रवारीला होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ७२ तृतीयपंथी मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या तीन वर्षांत मतदार यादीत २२ तृतीयपंथी मतदारांची भर पडली आहे. सन २०१४ पूर्वी कोणत्याही निवडणुकांमध्ये तृतीयपंथी मतदारांचा समावेश पुरुष गटातच केला जात होता. परंतु, तृतीयपंथीयांना स्त्री-पुरुष गटात न टाकता त्यांची इतर मतदार म्हणून स्वतंत्र नोंद करण्यात यावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा पुकारला होता. अखेर, सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तृतीयपंथीयांचा ‘इतर मतदार’ या स्वतंत्र कॅटेगिरीत समावेश करण्यात येऊन त्यांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. महाराष्ट्रात सुमारे ४१ हजारांहून अधिक तृतीयपंथी असल्याचे सांगितले जाते. त्यातील ९८४ तृतीयपंथीयांनीच मतदार यादीत नाव नोंदवले होते. सन २०१४ मध्ये झालेल्या नाशिक लोकसभा निवडणुकीत ५० तृतीयपंथी मतदार होते. परंतु इगतपुरीतील केवळ दोनच तृतीयपंथीयांनी मतदान केल्याची नोंद झाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ५० मतदार होते. आता महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी पहिल्यांदाच मतदान करणार असून, शहरात ७२ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत तृतीयपंथीय मतदारांच्या संख्येत २२ ने भर पडली आहे. विशेष म्हणजे राज्यात मुंबई महापालिका निवडणुकीत एक तृतीयपंथी उमेदवारही नशीब आजमावत आहे. इन्फो गुरूच्या शिफारशीने नोंदणी तृतीयपंथीयांकडून वयाचा अथवा निवासाचा दाखला उपलब्ध होणे अवघड असते. त्यामुळे मतदार यादीत कशाप्रकारे नोंद करायची, याबाबत संभ्रम होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, त्यांच्या गुरूने शिफारस केल्यानंतरच मतदार यादीत त्यांची नोंद करण्यात येऊ लागली आहे. मतदार नोंदणीच्या शपथपत्रात गुरू आणि चेला असे दोन रकाने ठेवलेले असतात. त्यात पालकाच्या नावाऐवजी गुरूचे नाव लिहायचे आणि गुरूने शिफारस केल्यानंतर त्यांची नोंद केली जाते. त्यामुळे मतदानाच्या हक्काबाबत आता तृतीयपंथीही जागरूक झाले आहेत.