शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:39 IST

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राचा दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री झालो. सर्वांत कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कमी तासांचे उपमुख्यमंत्री, असा आमचा रेकॉर्ड झाला. मात्र, त्या ७२ तासांच्या मुख्यमंत्रिपदानंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वरळी येथे आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान स्वीकारला. खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरवर्षी १ मे हा सण साजरा करणार : अजित पवारदरवर्षी १ मे हा महाराष्ट्राचा सण साजरा करणार आहोत. यात कोणतेही पक्षीय राजकारण नाही. आपले सरकार जनतेचे असून जनतेची कामे करत राहू. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, परंतु सुसंस्कृत राजकारण कसे असते, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिकवले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांची पाठमाजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला शरद पवार व उद्धव ठाकरे आले नाहीत. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तसेच उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रित केले होते. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना निमंत्रण दिले होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासह ‘मविआ’चे माजी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी चर्चा होती. परंतु, मुंबईत असूनही शरद पवार यांनी या कार्यक्रमाला नकार कळवला. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही कार्यक्रमाला येणार नाही, असे अगोदरच कळविले होते.

‘विविध छटा एकाच ठिकाणी पाहता येणारा सुंदर महोत्सव’महाराष्ट्राच्या विविध छटा एकाच ठिकाणी पाहता येणारा हा सुंदर महोत्सव आहे. महाराष्ट्र काय आहे, हे येथील दालनातून पाहायला मिळत असून ते प्रत्येक तरुणाने पाहायला हवे. शक्ती-भक्तीचा इतिहास, थोर पुरुष, महाराष्ट्र रत्नांचा धावता इतिहास पाहता येईल, अशी प्रभावी मांडणी आहे. ६५ वर्षांत झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान हे चांगले आयोजन आहे. सिंहावलोकन केल्यास काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला आहे. राजकीय मंच नसल्याने या महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस