शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

मुंबईतील ७/११ बॉम्बस्फोट: १२ जण दोषी, १ निर्दोष

By admin | Updated: September 11, 2015 17:37 IST

मुंबईतील ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - मुंबईतील ११ जुलै २००६ किंवा ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने  १२ आरोपींना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते.

न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी(३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२),शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४),  मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून अब्दुल शेख याची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या १२ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय प्रत्येक गुन्हेगाराला किती शिक्षा द्यायची हे जाहीर करणार आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली. 

११ जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनीटात सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. नऊ वर्षानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तत्कालिन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केली. दहशतवादविरोधी पथकाच्या तपासामध्ये आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा यांनी या बाँबस्फोटांची आखणी केली होती. 

७/११ च्या मुंबईतील रेल्वे बाँबस्फोटातील ठळक वैशिष्ट्ये:

- मुंबईतील उपनगरीय गाड्यांमध्ये आरडीएक्सचे एकूण सात बाँब ठेवण्यात आले होते.

- बाँब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला.

- या भयानक हल्ल्यामध्ये १८० प्रवासी ठार झाले तर सुमारे ८०० जण जखमी झाले.

- जून २००७मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली.

- कमाल अन्सारीने बंडखोरीला प्रोत्साहन देणे हा शब्दप्रयोग मोक्काच्या संदर्भात करणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने तो फेटाळला.

- हल्ला झाला त्यावेळी आरोपी कुठे होते हे तपासण्यासाठी मोबाईल कॉल रेकॉर्डरचा उपयोग करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली व डिसेंबर २०१२मध्ये तसा आदेश दिला, त्यावेळी चार आरोपी चर्चगेट तसेच बाँबस्फोट झालेल्या स्थानकांच्या जवळपास नसल्याचे आढळले.

- साक्षीदारांचे जबाब नोंदवलेल्या पानांची संख्या तब्बल ५५५० एवढी भरली.

- अखेर या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा पुरस्कृत १२ दहशतवाद्यांच्या क्रूरकृत्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करत त्यांना दोषी ठरवले.

- सोमवारी यापैकी प्रत्येकाला शिक्षा किती द्यायची यावर सुनावणी होणार असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.