शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ७/११ बॉम्बस्फोट: १२ जण दोषी, १ निर्दोष

By admin | Updated: September 11, 2015 17:37 IST

मुंबईतील ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - मुंबईतील ११ जुलै २००६ किंवा ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने  १२ आरोपींना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते.

न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी(३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२),शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४),  मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून अब्दुल शेख याची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या १२ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय प्रत्येक गुन्हेगाराला किती शिक्षा द्यायची हे जाहीर करणार आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली. 

११ जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनीटात सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. नऊ वर्षानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तत्कालिन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केली. दहशतवादविरोधी पथकाच्या तपासामध्ये आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा यांनी या बाँबस्फोटांची आखणी केली होती. 

७/११ च्या मुंबईतील रेल्वे बाँबस्फोटातील ठळक वैशिष्ट्ये:

- मुंबईतील उपनगरीय गाड्यांमध्ये आरडीएक्सचे एकूण सात बाँब ठेवण्यात आले होते.

- बाँब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला.

- या भयानक हल्ल्यामध्ये १८० प्रवासी ठार झाले तर सुमारे ८०० जण जखमी झाले.

- जून २००७मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली.

- कमाल अन्सारीने बंडखोरीला प्रोत्साहन देणे हा शब्दप्रयोग मोक्काच्या संदर्भात करणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने तो फेटाळला.

- हल्ला झाला त्यावेळी आरोपी कुठे होते हे तपासण्यासाठी मोबाईल कॉल रेकॉर्डरचा उपयोग करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली व डिसेंबर २०१२मध्ये तसा आदेश दिला, त्यावेळी चार आरोपी चर्चगेट तसेच बाँबस्फोट झालेल्या स्थानकांच्या जवळपास नसल्याचे आढळले.

- साक्षीदारांचे जबाब नोंदवलेल्या पानांची संख्या तब्बल ५५५० एवढी भरली.

- अखेर या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा पुरस्कृत १२ दहशतवाद्यांच्या क्रूरकृत्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करत त्यांना दोषी ठरवले.

- सोमवारी यापैकी प्रत्येकाला शिक्षा किती द्यायची यावर सुनावणी होणार असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.