शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

मुंबईतील ७/११ बॉम्बस्फोट: १२ जण दोषी, १ निर्दोष

By admin | Updated: September 11, 2015 17:37 IST

मुंबईतील ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - मुंबईतील ११ जुलै २००६ किंवा ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने  १२ आरोपींना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते.

न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी(३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२),शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४),  मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून अब्दुल शेख याची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या १२ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय प्रत्येक गुन्हेगाराला किती शिक्षा द्यायची हे जाहीर करणार आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली. 

११ जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनीटात सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. नऊ वर्षानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तत्कालिन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केली. दहशतवादविरोधी पथकाच्या तपासामध्ये आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा यांनी या बाँबस्फोटांची आखणी केली होती. 

७/११ च्या मुंबईतील रेल्वे बाँबस्फोटातील ठळक वैशिष्ट्ये:

- मुंबईतील उपनगरीय गाड्यांमध्ये आरडीएक्सचे एकूण सात बाँब ठेवण्यात आले होते.

- बाँब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला.

- या भयानक हल्ल्यामध्ये १८० प्रवासी ठार झाले तर सुमारे ८०० जण जखमी झाले.

- जून २००७मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली.

- कमाल अन्सारीने बंडखोरीला प्रोत्साहन देणे हा शब्दप्रयोग मोक्काच्या संदर्भात करणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने तो फेटाळला.

- हल्ला झाला त्यावेळी आरोपी कुठे होते हे तपासण्यासाठी मोबाईल कॉल रेकॉर्डरचा उपयोग करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली व डिसेंबर २०१२मध्ये तसा आदेश दिला, त्यावेळी चार आरोपी चर्चगेट तसेच बाँबस्फोट झालेल्या स्थानकांच्या जवळपास नसल्याचे आढळले.

- साक्षीदारांचे जबाब नोंदवलेल्या पानांची संख्या तब्बल ५५५० एवढी भरली.

- अखेर या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा पुरस्कृत १२ दहशतवाद्यांच्या क्रूरकृत्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करत त्यांना दोषी ठरवले.

- सोमवारी यापैकी प्रत्येकाला शिक्षा किती द्यायची यावर सुनावणी होणार असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.