शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

१९ हजार शिक्षकांसाठी मिळाले ७१ कोटी

By admin | Updated: December 29, 2016 21:01 IST

विनाअनुदानित १ हजार ६२८ शाळांमधील विनापगार काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने ७१ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला

ऑनलाइन लोकमत/अविनाश साबापुरेयवतमाळ, दि. 29 - विनाअनुदानित १ हजार ६२८ शाळांमधील विनापगार काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने ७१ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. हे अनुदान मार्चपूर्वीच वितरित करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त, संचालकांना देण्यात आल्या आहेत. यामुळे १९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.१४ जून २०१६ पूर्वी राज्यातील १ हजार ६२८ शाळा आणि २ हजार ४५२ वर्ग तुकड्या शिक्षण विभागाकडून अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आल्या होत्या. मात्र, तेथे कार्यरत असलेल्या साधारण १९ हजार २४७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्यापही वेतन सुरू झालेले नाही. हे कर्मचारी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करीत आहेत. वेतन अनुदानासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनांचा मार्गही चोखाळला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने १९ सप्टेंबर २०१६ रोजी या कर्मचाऱ्यांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला होता. खरे म्हणजे, या निर्णयावरही शिक्षक कर्मचाऱ्यांमधून संतापाची लाट निर्माण झाली होती. २० टक्के अनुदान मिळविण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणेही बंधनकारक करण्यात आले. या दोन अटी रद्द करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाचा खच साचला. परंतु, या अटी कायम ठेवूनच राज्य शासनाने सदर शाळांना अनुदान देण्यासाठी हिवाळी अधिवेशनातच पुरवणी मागणीच्या प्रस्तावात ७१ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला. निधी वितरणाबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून देयके वेळेत कोषागारात सादर करण्याच्या सूचनाही अधिवेशनातच देण्यात आल्या आहे. हा निधी शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे वळता केला जात आहे. त्यासंदर्भात २८ डिसेंबर रोजी शिक्षण विभागाने आयुक्त आणि संचालकांना सूचनाही दिल्या आहेत. शाळांच्या अनुदानासाठी उपलब्ध झालेला हा निधी कोणत्याही परिस्थितीत मार्च २०१७ पूर्वी वितरित करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास शिक्षकांच्या महत्प्रयासाने मिळालेला निधी व्यपगत होण्याची शक्यताही आहे. पात्रता शंभरची मिळणार २० टक्केदरम्यान, राज्यातील या दीड हजारांहून अधिक शाळांपैकी काही शाळा विविध शासन निर्णयानुसार ४० टक्के, ६० टक्के, ८० टक्के किंवा १०० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. परंतु, त्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष अनुदान सुरू झालेले नाही. हे अनुदान मिळविण्यासाठी राज्यभरात शिक्षकांनी आवाज उठविला. औरंगाबादमधील आंदोलन प्रचंड गाजले. त्यानंतर शासनाने १९ सप्टेंबरला अनुदान देण्याबाबत कसाबसा जीआर काढला. परंतु, त्यात केवळ २० टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यामुळे ८० किंवा १०० टक्के अनुदानास पात्र असलेल्या शाळांवर आता अन्याय होणार आहे.प्रस्तावासाठी आज अखेरचा दिवसराज्य शासनाने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी ७१ कोटी ५० लाख उपलब्ध करून दिले आहे. मात्र हे अनुदान मिळवायचे असेल तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना ३० डिसेंबरपूर्वी अनुदानाचा प्रस्ताव आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. हे काम अवघ्या एका दिवसात त्यांना करायचे आहे. जानेवारीच्या अखेरीस शिक्षण उपसंचालक स्तरावर या प्रस््तावांची पडताळणी केली जाणार आहे. १९ सप्टेंबरच्या जीआरमधील निकषांची पूर्तता संबंधित शाळा करीत असेल तरच २० टक्के अनुदान मिळणार आहे.