शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

प्रकल्पांचा डोंगर ७० हजार कोटींचा

By admin | Updated: November 18, 2014 02:33 IST

जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती.

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात जलसंपदा विभागाचे ४५२ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार ७४९.८८ कोटी रुपये लागणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार प्राधान्यक्रम ठरवणार की, जे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केले; तीच पद्धती पुढे चालू ठेवणार याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप राज्याला स्वतंत्र जलसंपदा मंत्री मिळालेला नाही, त्यामुळे अधिकारीदेखील शांत बसून आहेत.जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती. तेच आता राज्यात सत्तास्थानी आहेत. आघाडी सरकारने जे प्रकल्प १० टक्के पूर्ण झाले आणि जे ८० टक्के पूर्ण झाले अशा सगळ्याच प्रकल्पांना थोडे-थोडे पैसे देण्याची नीती अवलंबली होती. त्यातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही, प्रकल्पही पूर्ण झाले नाहीत आणि त्यांच्या किमतीदेखील सतत वाढत गेल्या. त्यामागे त्या-त्या मतदारसंघाचे स्थानिक राजकारणही केले गेले. राजकीय इच्छाशक्ती दाखवून जे प्रकल्प ७५ टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी देऊ अशी भूमिका कधीही मावळत्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही. त्यासाठी ते कायम राज्यपालांच्या निदेशांच्या आड लपत राहिले.आजही राज्यात ४५२ लहान, मध्यम व मोठे प्रकल्प निधीअभावी पडून आहेत. ज्यात ८० टक्के पूर्ण झालेलेही प्रकल्प आहेत आणि २५ टक्के काम झालेलेदेखील आहेत. आघाडी सरकारने जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढली त्यात ६७० प्रकल्पांसाठी ७८,४५०.७७ कोटी रुपये लागतील असे सांगितले होते. श्वेतपत्रिका ३० नोव्हेंबर २०१२ रोजी आली होती. तेव्हापासून भाजपा सरकार सत्तेवर येईपर्यंत ७७०१ कोटी रुपये खर्च करून २१८ छोटे प्रकल्प पूर्ण केल्याची आकडेवारी समोर आली आहे.