शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

प्रकल्पांचा डोंगर ७० हजार कोटींचा

By admin | Updated: November 18, 2014 02:33 IST

जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती.

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात जलसंपदा विभागाचे ४५२ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार ७४९.८८ कोटी रुपये लागणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार प्राधान्यक्रम ठरवणार की, जे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केले; तीच पद्धती पुढे चालू ठेवणार याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप राज्याला स्वतंत्र जलसंपदा मंत्री मिळालेला नाही, त्यामुळे अधिकारीदेखील शांत बसून आहेत.जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती. तेच आता राज्यात सत्तास्थानी आहेत. आघाडी सरकारने जे प्रकल्प १० टक्के पूर्ण झाले आणि जे ८० टक्के पूर्ण झाले अशा सगळ्याच प्रकल्पांना थोडे-थोडे पैसे देण्याची नीती अवलंबली होती. त्यातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही, प्रकल्पही पूर्ण झाले नाहीत आणि त्यांच्या किमतीदेखील सतत वाढत गेल्या. त्यामागे त्या-त्या मतदारसंघाचे स्थानिक राजकारणही केले गेले. राजकीय इच्छाशक्ती दाखवून जे प्रकल्प ७५ टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी देऊ अशी भूमिका कधीही मावळत्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही. त्यासाठी ते कायम राज्यपालांच्या निदेशांच्या आड लपत राहिले.आजही राज्यात ४५२ लहान, मध्यम व मोठे प्रकल्प निधीअभावी पडून आहेत. ज्यात ८० टक्के पूर्ण झालेलेही प्रकल्प आहेत आणि २५ टक्के काम झालेलेदेखील आहेत. आघाडी सरकारने जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढली त्यात ६७० प्रकल्पांसाठी ७८,४५०.७७ कोटी रुपये लागतील असे सांगितले होते. श्वेतपत्रिका ३० नोव्हेंबर २०१२ रोजी आली होती. तेव्हापासून भाजपा सरकार सत्तेवर येईपर्यंत ७७०१ कोटी रुपये खर्च करून २१८ छोटे प्रकल्प पूर्ण केल्याची आकडेवारी समोर आली आहे.