शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ७0 टक्के ओला, उबेर धोक्यात

By admin | Updated: March 6, 2017 02:44 IST

किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी (अ‍ॅप व वेब बेस)टॅक्सी सेवांचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

मुंबई : किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी (अ‍ॅप व वेब बेस)टॅक्सी सेवांचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २0१७ लागू करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. परंतु या निर्णयामुळे मुंबईत धावणाऱ्या ७0 टक्के ओला, उबेर आणि टॅक्सी फॉर श्युअरचे भवितव्य धोक्यात आले आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी स्वच्छ इंधनावर म्हणजेच एलपीजी किंवा सीएनजीवर चालणाऱ्या असतील असा नवा नियम असून त्यामुळे सध्या डिझेलवर धावणाऱ्या अ‍ॅप टॅक्सी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर शासनाकडून कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण न दिल्यामुळे बरीच समस्या सतावणार आहे. अ‍ॅप बेस टॅक्सी सध्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यामध्ये ओला, उबेर, टॅक्सी फॉर श्युअर अशा टॅक्सी चलनात आहेत. परंतु प्रवाशांची मागणी व पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडे आकारणी होतानाच गर्दीच्या काळात जादा भाडे आकारणी करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून आरटीओकडे येत होत्या. त्याचप्रमाणे या खासगी टॅक्सींवर निर्बंध आणावेत अशी मागणीही काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून केली जात होती. महत्वाची बाब म्हणजे प्रवाशांसोबत काही विपरित घटना घडल्यास अशा टॅक्सी सेवा चालवणाऱ्या कंपन्या त्यांच्यावरील जबाबदारी झटकून टाकतात. त्यामुळे या टॅक्सी सेवांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २0१७ लागू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. यातील नियमावलीनुसार ज्या शहरात व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी परवाना असा स्वतंत्र परवाना टॅक्सींसाठी देण्यात येईल. अशा टॅक्सी वातानुकूलित असतील, असे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर या टॅक्सी स्वच्छ इंधनावर म्हणजेच सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या असतील. महत्वाची बाब म्हणजे सध्या मुंबईत ७0 टक्के अ‍ॅप बेस टॅक्सी या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. शासनाकडून या नियमावलीचे स्पष्टीकरण देण्यात न आल्यामुळे वाहन मालकांमध्ये आणि कंपन्यांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. स्वच्छ इंधनावर धावणाऱ्या टॅक्सी हव्या असतील तर आताच्या डिझेलवर धावणाऱ्या टॅक्सी बंद करायचा कि त्याचे रुपांतर सीएनजी व एलपीजीमध्ये करायचे हादेखिल मोठी समस्या उभी ठाकली आहे. (प्रतिनिधी)>कमिशनचा मुद्दाप्रवास भाड्याचे दर कमाल व किमान अशा पध्दतीने प्रवास भाड्याची मर्यादा शासनाकडून निश्चित करण्यात येणार आहे. त्या मर्यादेच्या आत मागणी पुरवठा या त्यांच्या तत्वाने भाडे आकारणी केली जाईल. परंतु यामुळे अ‍ॅप बेस टॅक्सी चालकांच्या कमिशनचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयानंतर कमिशन कमी होण्याची भिती आहे. तर देण्यात येणारी सवलतही कमी होईल.