शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

मुंबईतील ७0 टक्के ओला, उबेर धोक्यात

By admin | Updated: March 6, 2017 02:44 IST

किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी (अ‍ॅप व वेब बेस)टॅक्सी सेवांचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

मुंबई : किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी (अ‍ॅप व वेब बेस)टॅक्सी सेवांचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २0१७ लागू करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. परंतु या निर्णयामुळे मुंबईत धावणाऱ्या ७0 टक्के ओला, उबेर आणि टॅक्सी फॉर श्युअरचे भवितव्य धोक्यात आले आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी स्वच्छ इंधनावर म्हणजेच एलपीजी किंवा सीएनजीवर चालणाऱ्या असतील असा नवा नियम असून त्यामुळे सध्या डिझेलवर धावणाऱ्या अ‍ॅप टॅक्सी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर शासनाकडून कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण न दिल्यामुळे बरीच समस्या सतावणार आहे. अ‍ॅप बेस टॅक्सी सध्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यामध्ये ओला, उबेर, टॅक्सी फॉर श्युअर अशा टॅक्सी चलनात आहेत. परंतु प्रवाशांची मागणी व पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडे आकारणी होतानाच गर्दीच्या काळात जादा भाडे आकारणी करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून आरटीओकडे येत होत्या. त्याचप्रमाणे या खासगी टॅक्सींवर निर्बंध आणावेत अशी मागणीही काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून केली जात होती. महत्वाची बाब म्हणजे प्रवाशांसोबत काही विपरित घटना घडल्यास अशा टॅक्सी सेवा चालवणाऱ्या कंपन्या त्यांच्यावरील जबाबदारी झटकून टाकतात. त्यामुळे या टॅक्सी सेवांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २0१७ लागू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. यातील नियमावलीनुसार ज्या शहरात व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी परवाना असा स्वतंत्र परवाना टॅक्सींसाठी देण्यात येईल. अशा टॅक्सी वातानुकूलित असतील, असे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर या टॅक्सी स्वच्छ इंधनावर म्हणजेच सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या असतील. महत्वाची बाब म्हणजे सध्या मुंबईत ७0 टक्के अ‍ॅप बेस टॅक्सी या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. शासनाकडून या नियमावलीचे स्पष्टीकरण देण्यात न आल्यामुळे वाहन मालकांमध्ये आणि कंपन्यांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. स्वच्छ इंधनावर धावणाऱ्या टॅक्सी हव्या असतील तर आताच्या डिझेलवर धावणाऱ्या टॅक्सी बंद करायचा कि त्याचे रुपांतर सीएनजी व एलपीजीमध्ये करायचे हादेखिल मोठी समस्या उभी ठाकली आहे. (प्रतिनिधी)>कमिशनचा मुद्दाप्रवास भाड्याचे दर कमाल व किमान अशा पध्दतीने प्रवास भाड्याची मर्यादा शासनाकडून निश्चित करण्यात येणार आहे. त्या मर्यादेच्या आत मागणी पुरवठा या त्यांच्या तत्वाने भाडे आकारणी केली जाईल. परंतु यामुळे अ‍ॅप बेस टॅक्सी चालकांच्या कमिशनचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयानंतर कमिशन कमी होण्याची भिती आहे. तर देण्यात येणारी सवलतही कमी होईल.