शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेट्रोलमध्ये जिरणार ७ टक्के इथेनॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:36 IST

महाराष्ट्र अग्रेसर; ८६ कोटी लिटरचा होणार पुरवठा

पुणे : देशात यंदा प्रथमच सात टक्के इथेनॉल पेट्रोलमधे जिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती उद्योगांनी देशातील आॅईल कंपन्यांशी तब्बल २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. त्यापैकी ७५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देखील केला आहे. देशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ८६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होईल.

देशाने २०१८ साली बायो फ्युएल पॉलिसी स्वीकारली. त्यानुसार २०३० पर्यंत इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा संकल्प आहे. देशातील इंधनाचा खप लक्षात घेता दहा टक्के इथेनॉल मिश्रण करायचे झाल्यास ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यंदा २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यात यश आल्यास, ७ टक्के इथेनॉल मिश्रण शक्य होईल, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

राज्यातून ८६ कोटी लिटर इथेनॉलमहाराष्ट्रातून ८६ कोटी इथेनॉलचा पुरवठा होईल. त्यातील ४२ कोटी लिटर इथेनॉलचे राज्यातील इंधानामध्ये मिश्रण होईल. उवर्रित ४४ कोटी इथेनॉल दुसऱ्या राज्यात पाठविले जाईल. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ९ टक्के इथेनॉलचे मिश्रण झाले झाले आहे.देशभरातून २३७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठ्याचे करार करण्यात आाले असून, त्यातील ४५ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून होईल. १६.५ कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यातून उत्पादित करण्यात येणार आहे. 

कारखान्यांना सुरळीत पत पुरवठा होण्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :Petrolपेट्रोल