शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

७ कि.मी.चा रस्ता; ७ वर्षांत ७५० अपघात--फटका--समस्यांचा महामार्ग

By admin | Updated: January 11, 2016 01:07 IST

टोप ते तावडे हॉटेल महामार्ग : दिवसाला सरासरी तीन अपघात; रस्ते कामातील त्रुटींचा वाहनधारकांना

सतीश पाटील --शिरोली -सुरक्षित आणि जलद वाहतुकीसाठी बारा वर्षांपूर्वी अद्ययावत आणि विस्तृत असा चौपदरी महामार्ग तयार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघाताचे प्रमाण घटेल, दळणवळणाचा वेग वाढेल असे वाटत होते. पण, काही अपुरी कामे आणि दुरुस्तीच्या दुर्लक्षामुळे कागल ते सातारा हा १३३ किलोमीटर लांबीचा महामार्ग जणू मृत्यूमार्गच बनला आहे.टोप ते तावडे हॉटेल या सात किलोमीटरमधील रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या सात किलोमीटर अंतरात सात वर्षांत तब्बल ७५० अपघात झाले आहेत. या ठिकाणी सरासरी दिवसाला तीन अपघात होतात. या ठिकाणी आतापर्यंत तब्बल ३५५जण गंभीर जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर १५३ जणांना प्राण गमवावे लागले. कागल-सातारा रस्त्याचे चौपदरीकरण २००६ मध्ये पूर्ण होऊन वाहतुकीस महामार्ग खुला झाला. पण, कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराचे चौपदरीकरण करताना काही ठिकाणी कामात चालढकल झाल्याचे दिसते. त्यामुळे दुपदरी महामार्ग असताना जेथे अपघात क्षेत्र होते ते आजही तशीच आहेत. त्यात प्रामुख्याने टोप, शिये फाटा, नागांव फाटा, सांगली फाटा, तावडे हॉटेल ही ठिकाणे येतात.चौपदरीकरणावेळी राहिल्या त्रुटी आणि दररोज ढासळणारा दर्जा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर टोप, नागांव फाटा, सांगली फाटा, अंबप फाटा येथे उड्डाणपुलाची गरज आजही आहे. याठिकाणी उड्डाणपूल उभारले असते तर अपघातांचे प्रमाण घटले असते. सध्या सहापदरी महामार्ग करण्याच्या दृष्टीने कागल, किणी, आणि तासवडे याठिकाणी तीन संगणक संच बसवून या मार्गावरील वाहनांची संख्या मोजण्याचे काम सुरू आहे. यात चारचाकी, दुचाकी, तीनचाकी, मोठी अवजड वाहने, बैलगाडी, सायकल अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. यावेळी तरी शासनाने कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराच्या रस्त्याचा सर्व्हे करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि मगच सहापदरीचे काम सुरू करावे. यावेळी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. भविष्यात महामार्गावरील वाहतूक वाढणार असून, अपघाताचा धोका वाढणार आहे. ( क्रमश:)कागल सातारा सहापदरीचे काम करीत असताना टोप येथे गावच्यावतीने उड्डाणपुलाची मागणी केली आहे. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार आहे, वाहने वेगाने येत असल्यामुळे दररोजचा अपघात ठरलेला असतो. उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामहामार्गाच्या पुणे कार्यालयात जाऊन मागणी केली आहे. उड्डाणपूल झाला नाही तर नियोजित रस्त्याचे काम होऊ देणार नाही. - धनश्री दौलत पाटील,सरपंच, टोप सांगली फाटा हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. नागांव फाटा ते सांगली फाट्यापर्यंत उड्डाणपूल होणे आवश्यक आहे, त्यामुळे नागाव फाटा ते सांगली फाट्यापर्यंतचे अपघात कमी होतील. सांगली फाटा येथे कोल्हापूर-सांगली, पुणे-बंगलोर महामार्ग हे दोन्ही एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते म्हणूनच या ठिकाणी उड्डाणपूलाची गरजच आहे. -बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली टोप ते तावडे हॉटेल रस्त्यावरील अपघातवर्षअपघात मयतजखमी२००९०९८१९५२२०१०१३१४०९७२०१११२१२६५३२०१२१२६२२५८२०१३०६११७४८२०१४१०७१८८३२०१५०६०११४७एकूण७०४१५३४३८जवळच नजर लागावी असा रस्ताकोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही. कागलपासून हाकेच्या अंतरावर कर्नाटकातील महामार्ग नजर लागावी असा आहे. येथील सुविधा आणि प्रशस्त रस्ते पाहिल्यावर आपल्याकडील कामाची कीव येते. निदान सहापदरीच्या कामावेळी तरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चांगले काम करून घ्यावे अशी वाहतूकदार, प्रवाशांची अपेक्षा आहे. एक दृष्टीक्षेप750--अपघात355--गंभीर जखमी 153--बळी