शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

कोल्हापूरमध्ये ६९ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 03:11 IST

सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण

कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी अपूर्व, अत्यंत चुरशीने सरासरी ६८.८२ टक्के मतदान झाले. ही निवडणूक केवळ कोल्हापूर शहरावर सत्ता कोणाची, हे ठरविणारी नसून, भविष्यातील राज्य सरकारच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. सर्वच केंद्रांबाहेर कोल्हापूरकरांनी गर्दी करून मोठ्या उत्साहाने मतदान केले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या प्रतिष्ठेची बनविली असल्याने, केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर रांगा लागल्या. शहरातील ८१ प्रभागांत ही निवडणूक होत असून, सर्व ३७८ मतदान केंद्रांवर मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले. एक केंद्रावर सरासरी १२०० ते १४०० मतदान होते. मतदानाची प्रक्रिया संथपणे सुरू राहिल्याने गर्दी वाढली. मतदानाची गती अगदीच संथ होती, खोली क्रमांक नीट न कळल्याने वेळ खूप गेला. (प्रतिनिधी) दुबार नावांचा घोळ कायम शहरातील ८१ प्रभागांत दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या १७ हजार इतकी आहे. दुबार नावे कमी करण्याचा अधिकार महापालिका अधिकाऱ्यांना नसल्याने ती तशीच यादीत राहिली आहेत, परंतु ज्यांचे नाव दुबार म्हणून नोंदले गेले, त्या मतदारांना घराजवळच्या मतदान केंद्रावर आणि तेही एकाच ठिकाणी मतदान करण्यास परवानगी दिली होती, परंतु काही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षांनी अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानच करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मतदार आणि केंद्राध्यक्ष यांच्यात वाद होत राहिला. विशेषत: साळोखेनगरमधील शिवशक्ती हायस्कूलमध्ये असे प्रकार घडले.टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अ‍ॅपपूर्वी मतदान बूथवर मतदारांची नावे शोधण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते याद्या घेऊन बसलेले असत, परंतु या निवडणुकीत याद्यांची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली. मतदाराचे नाव शोधण्यासाठी टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात आला.रुईकर कॉलनीत वादावादी दुपारी रुईकर कॉलनी येथील हिंद विद्यामंदिर केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते डोक्यावर पक्षाची टोपी व गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून गेल्यामुुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. कार्यकर्ते थेट केंद्रात घुसल्याने विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले.