शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

६८ वर्षांची झाली एस.टी.! :

By admin | Updated: June 1, 2016 08:31 IST

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक,

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडण-घडण झाली, त्यामध्ये एस. टी. बसचा वाटा आहेच. एस.टी.ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कच्च्या रस्त्यावरील धुराळा उडवत, ऊन-पावसाची तमा न बाळगता, प्रसंगी वादळाचे तडाखे सहन करत राज्याची ध्येय-धोरणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे केलेले आहे. या ६८ वर्षांच्या कालखंडात अनेक चढ-उतार एस.टी.च्या बसने ओलांडले आहेत.

केवळ ३५ बेडफोर्ड वाहनांवर १ जून १९४८ला एस.टी.ची सुरु वात झाली. एस.टी. ऐवजी सरकारी बस अशीच ओळख होती. प्रवासासाठी रस्ते अतिशय खराब असल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण फार. त्यामुळे साधारण १५० कि.मी.च्या पुढे प्रवास होत नव्हता. गाड्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ड्रायव्हरला अवजारांची पेटी बरोबर घ्यावी लागायची.एस.टी.ची पहिली बस धावली ती पुणे-नगर या शहरांदरम्यान. नगर शहरात साखर कारखान्याची निर्मिती होऊ लागली होती, त्यामुळे दळण-वळणाचा प्रश्न होताच. पुणे ते नगरचे त्याकाळी तिकीट होते ९ पैसे!ट्रक किंवा जीपच्या पुढील आकार कसा असतो, तसाच पुढील आकार या सरकारी वाहनाचा होता. संपूर्ण बॉडीची बांधणी व आसन-व्यवस्था लाकडाची होती. खिडक्या म्हणून खाकी ताडपत्रीची तावदान. हॉर्न वाजवत पम पम करत एस.टी गावात आली की तिचे फार जल्लोषात स्वागत होत असे. रात्रीच्या वस्तीला गावात असलेल्या गाडीला सकाळी जेव्हा स्टार्ट करायचे असे तेव्हा गाडीच्या पुढील भागात एक पुली असायची. त्या पुलीला कंडक्टर हँडल मारून गाडीचे इंजिन स्टार्ट करायचा. थंडीच्या दिवसात हे काम फार जिकरीचे असायचे. थंड झालेले इंजिन गरम व्हायला वेळ लागायचा. मग गावातील थोडेसे दणकट ग्रामस्थ हँडल मारायच्या कामात कंडक्टरची मदत करायचे.खाकी गणवेश व डोक्यावर पिक-कॅप हा कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा पेहराव. गावात या सरकारी गाडीचा व कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा फारच सन्मान. गावाचे सरपंच व कोतवाल अगदी त्यांची जेवणापासून ते राहण्यापर्यंत व्यवस्थित काळजी घेत असत. या प्रवासी वाहनाची गरज वाढू लागली तस-तसा विस्तारही सुरू झाला.मोठमोठ्या कंपन्यांची बांधणी असलेली एस.टी. बस तयार होऊ लागली. ती धावू लागली. आपल्या गावात एस.टी. यावी म्हणून सर्व गावाच्या गाव अंगमेहनतीने रस्ता तयार करायचा व ज्या दिवशी एस.टी. बस गावात येणार असायची त्यावेळी संपूर्ण गाव पताकांनी सजायचा. बॅण्ड पथकाच्या सहाय्याने वाजत-गाजत एस.टी.बसचे स्वागत व्हायचे. टप्याटप्प्याने ‘जिथे गाव तिथे रस्ता’ या शासनाच्या धोरणानुसार एस.टी.ची बस धावू लागली. एस.टी.ने केवळ गावच नव्हे माणसातील नातीही जोडली.एस.टी.चा सुरु वातीचा काळ फार खडतर होता. बसगाड्यांची अवस्था फारशी बरी नव्हती. आगार-व्यवस्थापकांची कार्यालये पत्र्यांच्या शेडमध्ये असत. कार्यशाळेतील कर्मचारी पावसात व चिखलात भिजून प्रवाशांसाठी बसेस तयार करीत असत. म्हणून आज जो एस.टी.चा विस्तार झाला आहे, तो याच कर्मचाऱ्यांच्या जीवावर.महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात एस.टी.चा वाटा हा सिहांचा आहे. एस.टी.बसमुळेच विद्यार्थ्यांचे शहरात येऊन पुढील शिक्षण घेणे शक्य झाले. शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एस.टी. बसनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत. त्यात खुशालीचे पत्रे व निरोपही असत. संपूर्ण ग्रामीण यंत्रणाच एस.टी.बसवर अवलंबून होती. एखादी बाळंतपणासाठी अडलेली भगिनी असो वा सर्पदंश झालेला रु ग्ण, अशा आपत्कालीन स्थितीत एस.टी.चे वाहन गावकऱ्यांच्या उपयोगी पडते. पोस्ट खात्याची टपाल सेवा, औषधांचे वितरण, वृत्तपत्रे, होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, सण-उत्सव व लग्न सराईमध्ये प्रवाशांची सुखरूप ने-आण हे सर्व एस.टीवरच अवलंबून असायची.१९५० साली प्रवाशी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झाले व अधिकृत एस.टी महामंडळाची निर्मिती झाली. दिवसेंदिवस महामंडळ प्रगतीच्या व बदलाच्या दिशेने प्रवास करू लागले. १९५० साली २ लक्झरी बसेस नीलकमल व ग्लोरीया, रोहिणी पुणे ते महाबळेश्वर या पर्यटन मार्गावर धावू लागल्या.