शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

By admin | Updated: March 1, 2016 14:58 IST

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे.

- सचिन नारकर 
जैतापूर दि. १ - देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,  केंद्रीय अर्थमंत्री कॉर्पोरेटकडून खेड्याकडे जायची भाषा करू लागले आहेत. पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही एका रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे. एका छोट्या सोयीची वाट पाहणा-या डोळ्यांमधले पाणी आटले, तरी प्रशासन वा लोकप्रतिनिधींना पाझर फुटलेला नाही. 
चारही बाजूंनी जैतापूरच्या खाडीने वेढलेल्या या जुवे बेटाकडे ना संख्याबळ आहे, ना मतांचा गठ्ठा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जुवे बेटावरची वस्ती अवघी १०१! या इवल्याशा बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी ओळख आहे, तंटामुक्ती हा या लोकवस्तीचा स्वभाव आहे. इथला शिमग्याचा सण प्रसिद्ध आहे. त्यावेळी वाजविली जाणारी जुन्या पद्घतीची वाद्ये आजही जैतापूर आगरवाडीच्या पट्ट्याचे आकर्षण आहे. चारही बाजूने खारे पाणी पण बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यटनासाठी आदर्श म्हणावे असे हे बेट मुख्य भूमीशी नाळ जोडण्यासाठी टाहो फोडत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सॅम पिट्रोडांच्या मदतीने साकारू पाहात असलेल्या दळणवळणाच्या क्रांतीला अवघा देश १९८६-८७च्या काळात सामोरा जात होता. नेमक्या त्याच काळात धाऊलवल्ली गावाशी हे बेट एका जोडरस्त्याने जोडण्याचे काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. राघव वाडी पासून रस्ता झालेला आहे पण वादामुळे बंद करण्यात आला आहे. आमदार खासदारांनी या समस्कयेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हे गाव वैद्यकीय सेवा, रोजचा लागणारा बाजार, दळणवळणच्या दृष्टीने अजूनही मागास आहे. इतकेच नव्हे, तर वानर, डुक्कर, कोल्हे व इतर जंगली श्वापदंचा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही या बेटावर जायला छोट्या होडीचा वापर करावा लागतो. शाळेतील मुले, अाबाल वृध्द, आजारी व्यक्तीही असाच प्रवास करतात. याबाबतीत सरकारला फुटेल का हो पाझर... या प्रश्नाचा शोध ही १०१ माणसे अव्याहत घेत आहेत. 
या पट्ट्यातील कोकणी माणूस मात्र अभिमानाने सांगतो....हे एक बेट आहे....याच्या चारही बाजूने खारे पाणी आहे....आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत! 
त्यात आसवांचा खारटपणा मिसळण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील कोकणी माणूस या बेटाच्या रस्त्यासाठी एकवटू पाहात आहे.