शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

By admin | Updated: March 1, 2016 14:58 IST

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे.

- सचिन नारकर 
जैतापूर दि. १ - देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,  केंद्रीय अर्थमंत्री कॉर्पोरेटकडून खेड्याकडे जायची भाषा करू लागले आहेत. पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही एका रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे. एका छोट्या सोयीची वाट पाहणा-या डोळ्यांमधले पाणी आटले, तरी प्रशासन वा लोकप्रतिनिधींना पाझर फुटलेला नाही. 
चारही बाजूंनी जैतापूरच्या खाडीने वेढलेल्या या जुवे बेटाकडे ना संख्याबळ आहे, ना मतांचा गठ्ठा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जुवे बेटावरची वस्ती अवघी १०१! या इवल्याशा बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी ओळख आहे, तंटामुक्ती हा या लोकवस्तीचा स्वभाव आहे. इथला शिमग्याचा सण प्रसिद्ध आहे. त्यावेळी वाजविली जाणारी जुन्या पद्घतीची वाद्ये आजही जैतापूर आगरवाडीच्या पट्ट्याचे आकर्षण आहे. चारही बाजूने खारे पाणी पण बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यटनासाठी आदर्श म्हणावे असे हे बेट मुख्य भूमीशी नाळ जोडण्यासाठी टाहो फोडत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सॅम पिट्रोडांच्या मदतीने साकारू पाहात असलेल्या दळणवळणाच्या क्रांतीला अवघा देश १९८६-८७च्या काळात सामोरा जात होता. नेमक्या त्याच काळात धाऊलवल्ली गावाशी हे बेट एका जोडरस्त्याने जोडण्याचे काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. राघव वाडी पासून रस्ता झालेला आहे पण वादामुळे बंद करण्यात आला आहे. आमदार खासदारांनी या समस्कयेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हे गाव वैद्यकीय सेवा, रोजचा लागणारा बाजार, दळणवळणच्या दृष्टीने अजूनही मागास आहे. इतकेच नव्हे, तर वानर, डुक्कर, कोल्हे व इतर जंगली श्वापदंचा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही या बेटावर जायला छोट्या होडीचा वापर करावा लागतो. शाळेतील मुले, अाबाल वृध्द, आजारी व्यक्तीही असाच प्रवास करतात. याबाबतीत सरकारला फुटेल का हो पाझर... या प्रश्नाचा शोध ही १०१ माणसे अव्याहत घेत आहेत. 
या पट्ट्यातील कोकणी माणूस मात्र अभिमानाने सांगतो....हे एक बेट आहे....याच्या चारही बाजूने खारे पाणी आहे....आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत! 
त्यात आसवांचा खारटपणा मिसळण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील कोकणी माणूस या बेटाच्या रस्त्यासाठी एकवटू पाहात आहे.