शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

By admin | Updated: March 1, 2016 14:58 IST

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे.

- सचिन नारकर 
जैतापूर दि. १ - देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,  केंद्रीय अर्थमंत्री कॉर्पोरेटकडून खेड्याकडे जायची भाषा करू लागले आहेत. पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही एका रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे. एका छोट्या सोयीची वाट पाहणा-या डोळ्यांमधले पाणी आटले, तरी प्रशासन वा लोकप्रतिनिधींना पाझर फुटलेला नाही. 
चारही बाजूंनी जैतापूरच्या खाडीने वेढलेल्या या जुवे बेटाकडे ना संख्याबळ आहे, ना मतांचा गठ्ठा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जुवे बेटावरची वस्ती अवघी १०१! या इवल्याशा बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी ओळख आहे, तंटामुक्ती हा या लोकवस्तीचा स्वभाव आहे. इथला शिमग्याचा सण प्रसिद्ध आहे. त्यावेळी वाजविली जाणारी जुन्या पद्घतीची वाद्ये आजही जैतापूर आगरवाडीच्या पट्ट्याचे आकर्षण आहे. चारही बाजूने खारे पाणी पण बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यटनासाठी आदर्श म्हणावे असे हे बेट मुख्य भूमीशी नाळ जोडण्यासाठी टाहो फोडत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सॅम पिट्रोडांच्या मदतीने साकारू पाहात असलेल्या दळणवळणाच्या क्रांतीला अवघा देश १९८६-८७च्या काळात सामोरा जात होता. नेमक्या त्याच काळात धाऊलवल्ली गावाशी हे बेट एका जोडरस्त्याने जोडण्याचे काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. राघव वाडी पासून रस्ता झालेला आहे पण वादामुळे बंद करण्यात आला आहे. आमदार खासदारांनी या समस्कयेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हे गाव वैद्यकीय सेवा, रोजचा लागणारा बाजार, दळणवळणच्या दृष्टीने अजूनही मागास आहे. इतकेच नव्हे, तर वानर, डुक्कर, कोल्हे व इतर जंगली श्वापदंचा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही या बेटावर जायला छोट्या होडीचा वापर करावा लागतो. शाळेतील मुले, अाबाल वृध्द, आजारी व्यक्तीही असाच प्रवास करतात. याबाबतीत सरकारला फुटेल का हो पाझर... या प्रश्नाचा शोध ही १०१ माणसे अव्याहत घेत आहेत. 
या पट्ट्यातील कोकणी माणूस मात्र अभिमानाने सांगतो....हे एक बेट आहे....याच्या चारही बाजूने खारे पाणी आहे....आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत! 
त्यात आसवांचा खारटपणा मिसळण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील कोकणी माणूस या बेटाच्या रस्त्यासाठी एकवटू पाहात आहे.