शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

By admin | Updated: March 1, 2016 14:58 IST

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे.

- सचिन नारकर 
जैतापूर दि. १ - देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,  केंद्रीय अर्थमंत्री कॉर्पोरेटकडून खेड्याकडे जायची भाषा करू लागले आहेत. पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही एका रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे. एका छोट्या सोयीची वाट पाहणा-या डोळ्यांमधले पाणी आटले, तरी प्रशासन वा लोकप्रतिनिधींना पाझर फुटलेला नाही. 
चारही बाजूंनी जैतापूरच्या खाडीने वेढलेल्या या जुवे बेटाकडे ना संख्याबळ आहे, ना मतांचा गठ्ठा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जुवे बेटावरची वस्ती अवघी १०१! या इवल्याशा बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी ओळख आहे, तंटामुक्ती हा या लोकवस्तीचा स्वभाव आहे. इथला शिमग्याचा सण प्रसिद्ध आहे. त्यावेळी वाजविली जाणारी जुन्या पद्घतीची वाद्ये आजही जैतापूर आगरवाडीच्या पट्ट्याचे आकर्षण आहे. चारही बाजूने खारे पाणी पण बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यटनासाठी आदर्श म्हणावे असे हे बेट मुख्य भूमीशी नाळ जोडण्यासाठी टाहो फोडत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सॅम पिट्रोडांच्या मदतीने साकारू पाहात असलेल्या दळणवळणाच्या क्रांतीला अवघा देश १९८६-८७च्या काळात सामोरा जात होता. नेमक्या त्याच काळात धाऊलवल्ली गावाशी हे बेट एका जोडरस्त्याने जोडण्याचे काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. राघव वाडी पासून रस्ता झालेला आहे पण वादामुळे बंद करण्यात आला आहे. आमदार खासदारांनी या समस्कयेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हे गाव वैद्यकीय सेवा, रोजचा लागणारा बाजार, दळणवळणच्या दृष्टीने अजूनही मागास आहे. इतकेच नव्हे, तर वानर, डुक्कर, कोल्हे व इतर जंगली श्वापदंचा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही या बेटावर जायला छोट्या होडीचा वापर करावा लागतो. शाळेतील मुले, अाबाल वृध्द, आजारी व्यक्तीही असाच प्रवास करतात. याबाबतीत सरकारला फुटेल का हो पाझर... या प्रश्नाचा शोध ही १०१ माणसे अव्याहत घेत आहेत. 
या पट्ट्यातील कोकणी माणूस मात्र अभिमानाने सांगतो....हे एक बेट आहे....याच्या चारही बाजूने खारे पाणी आहे....आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत! 
त्यात आसवांचा खारटपणा मिसळण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील कोकणी माणूस या बेटाच्या रस्त्यासाठी एकवटू पाहात आहे.