शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

मुंबईतील ६१ हजार व्यक्ती बेपत्ता !

By admin | Updated: April 23, 2015 05:37 IST

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या तर ११,५३७ व्यक्तींचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशी माहितीमाहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जांवर गुन्हे शाखेच्या हरवलेल्या व्यक्तींसंबंधीच्या केंद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार वर्ष २०१० पासून ते मार्च २०१५ पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत व्यक्ती हरविल्याच्या एकूण ६१,०५० तक्रारींची नोंद झाली. या बेपत्ता व्यक्तींमध्ये २९,६६९ पुरुष व ३१,३९१ महिलांचा समावेश होता.या बेपत्ता व्यक्तींची वर्षनिहाय आकडेवारी अशी : वर्ष २०१०- ४,४५५६ पुरुष व ४,९४९ महिला. वर्ष २०११-४,५८१ पुरुष व ५,३०२ महिला. वर्ष २०१२- ७,३३६ पुरुष व ८,४१९ महिला. वर्ष २०१३- ५,९९३ पुरुष व ६,५६४ महिला. वर्ष २०१४-५,९४६ पुरुष व ४,९७० महिला. मार्च २०१५ पर्यंत १,२५७ पुरुष व १,१८७ महिला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या या व्यक्तींपैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत सापडल्या. त्यात ३०६ पुरुष व १५० महिलांचा समावेश होता. मृतावस्थेत आढळलेल्यांमध्ये १० वर्षापर्यंतच्या वयाची १६ लहान मुले होती. त्यात १० मुलगे व सहा मुली होत्या. कोठारी यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार या बेपत्ता व्यक्तींपैकी ४३,८९४ व्यक्तींचा कालांतराने शोध लागला असून ११, ५३७ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. अद्याप शोध न लागलेल्यांमध्ये १० वर्षांखालील वयाच्या २८३ मुलांचा समावेश आहे. १,१२५ व्यक्ती वर्ष २०१० पासून, १,४३२ व्यक्ती वर्ष २०११ पासून, २,९८७ व्यक्ती वर्ष २०१२ पासून, ४,२९८ व्यक्ती वर्ष २०१३ पासून तर १,२४३ व्यक्ती वर्ष २०१४ पासून बेपत्ता आहेत. (विशेष प्रतिनिधी)