शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

मुंबईतील ६१ हजार व्यक्ती बेपत्ता !

By admin | Updated: April 23, 2015 05:37 IST

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या तर ११,५३७ व्यक्तींचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशी माहितीमाहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जांवर गुन्हे शाखेच्या हरवलेल्या व्यक्तींसंबंधीच्या केंद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार वर्ष २०१० पासून ते मार्च २०१५ पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत व्यक्ती हरविल्याच्या एकूण ६१,०५० तक्रारींची नोंद झाली. या बेपत्ता व्यक्तींमध्ये २९,६६९ पुरुष व ३१,३९१ महिलांचा समावेश होता.या बेपत्ता व्यक्तींची वर्षनिहाय आकडेवारी अशी : वर्ष २०१०- ४,४५५६ पुरुष व ४,९४९ महिला. वर्ष २०११-४,५८१ पुरुष व ५,३०२ महिला. वर्ष २०१२- ७,३३६ पुरुष व ८,४१९ महिला. वर्ष २०१३- ५,९९३ पुरुष व ६,५६४ महिला. वर्ष २०१४-५,९४६ पुरुष व ४,९७० महिला. मार्च २०१५ पर्यंत १,२५७ पुरुष व १,१८७ महिला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या या व्यक्तींपैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत सापडल्या. त्यात ३०६ पुरुष व १५० महिलांचा समावेश होता. मृतावस्थेत आढळलेल्यांमध्ये १० वर्षापर्यंतच्या वयाची १६ लहान मुले होती. त्यात १० मुलगे व सहा मुली होत्या. कोठारी यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार या बेपत्ता व्यक्तींपैकी ४३,८९४ व्यक्तींचा कालांतराने शोध लागला असून ११, ५३७ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. अद्याप शोध न लागलेल्यांमध्ये १० वर्षांखालील वयाच्या २८३ मुलांचा समावेश आहे. १,१२५ व्यक्ती वर्ष २०१० पासून, १,४३२ व्यक्ती वर्ष २०११ पासून, २,९८७ व्यक्ती वर्ष २०१२ पासून, ४,२९८ व्यक्ती वर्ष २०१३ पासून तर १,२४३ व्यक्ती वर्ष २०१४ पासून बेपत्ता आहेत. (विशेष प्रतिनिधी)