शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मुंबईतील ६१ हजार व्यक्ती बेपत्ता !

By admin | Updated: April 23, 2015 05:37 IST

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या तर ११,५३७ व्यक्तींचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशी माहितीमाहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जांवर गुन्हे शाखेच्या हरवलेल्या व्यक्तींसंबंधीच्या केंद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार वर्ष २०१० पासून ते मार्च २०१५ पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत व्यक्ती हरविल्याच्या एकूण ६१,०५० तक्रारींची नोंद झाली. या बेपत्ता व्यक्तींमध्ये २९,६६९ पुरुष व ३१,३९१ महिलांचा समावेश होता.या बेपत्ता व्यक्तींची वर्षनिहाय आकडेवारी अशी : वर्ष २०१०- ४,४५५६ पुरुष व ४,९४९ महिला. वर्ष २०११-४,५८१ पुरुष व ५,३०२ महिला. वर्ष २०१२- ७,३३६ पुरुष व ८,४१९ महिला. वर्ष २०१३- ५,९९३ पुरुष व ६,५६४ महिला. वर्ष २०१४-५,९४६ पुरुष व ४,९७० महिला. मार्च २०१५ पर्यंत १,२५७ पुरुष व १,१८७ महिला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या या व्यक्तींपैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत सापडल्या. त्यात ३०६ पुरुष व १५० महिलांचा समावेश होता. मृतावस्थेत आढळलेल्यांमध्ये १० वर्षापर्यंतच्या वयाची १६ लहान मुले होती. त्यात १० मुलगे व सहा मुली होत्या. कोठारी यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार या बेपत्ता व्यक्तींपैकी ४३,८९४ व्यक्तींचा कालांतराने शोध लागला असून ११, ५३७ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. अद्याप शोध न लागलेल्यांमध्ये १० वर्षांखालील वयाच्या २८३ मुलांचा समावेश आहे. १,१२५ व्यक्ती वर्ष २०१० पासून, १,४३२ व्यक्ती वर्ष २०११ पासून, २,९८७ व्यक्ती वर्ष २०१२ पासून, ४,२९८ व्यक्ती वर्ष २०१३ पासून तर १,२४३ व्यक्ती वर्ष २०१४ पासून बेपत्ता आहेत. (विशेष प्रतिनिधी)